शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

२३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या वर्षांच्या भात, नागली व फळबाग विम्यापोटी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३ कोटींची भरपाई मिळाली. या जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील २३ हजारपेक्षा अधिक शेतकरी दोन्ही जिल्ह्यांत कोट्यवधींच्या विमा भरपाई रकमेपासून आजपर्यंत वंचित आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात या प्रधानमंत्री पीकविमा योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपन्यांनी, तर पालघर जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा शेकडो हेक्टर शेतीचा विमा काढलेला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली ठाणे जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार ३२ हजार ६५० शेतकऱ्यांनी भात व नागली पिकांचा विमा काढला होता. त्यासाठी या शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख ३८ हजारांचा हप्ता भरला होता. जिल्ह्यातील २८ हजार ७२९ शेतकऱ्यांना २३ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. तब्बल तीन हजार ९२१ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार हजार ४४७ शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांच्या तब्बल एक कोटी ४० लाख ४७ हजारांचा विमा हप्ता भरला होता. अवघ्या १६ शेतकऱ्यांना फक्त चार लाख ३० हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे. या फळबाग विमा भरपाईच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील तब्बल चार हजार ४३१ शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तर पालघर जिल्ह्यातील ९१० शेतकऱ्यांना भात व नागलीच्या पिकांसाठी दोन कोटी चार लाख ३५ हजारांची विमा भरपाई मिळाली आहे. या भात व नागलीचा विमा काढलेल्या तब्बल १९ हजार १७४ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. तर अवघ्या दोन हजार ३८ शेतकऱ्यांना त्यांच्या फळबाग विम्यापोटी चार कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे.

----------

पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू

यंदाच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंतची मदत दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षाच्या विमाभरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संबंधित कंपन्यांच्या संपर्कात आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहाेत, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.