शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

उल्हासनगरात लाखोचा खर्च करूनही अर्धेअधिक हॅन्डपंप बंद; पाणी टंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:06 PM

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी ४५० कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेचा फज्जा उडाला असून दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही अर्धेअधिक हॅण्डपंप बंद आहेत. याप्रकाराने नागरिकांवर पाणी टंचाईची तलवार टांगती उभी ठाकल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीने गेल्या आठवड्यात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या निर्णयामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. शहर पूर्वेतील अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होत असून एमआयडीसीच्या या निर्णयामुळे पूर्वेत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी व्यक्त केली. तसेच प्रभाग समिती क्रं-४ मध्ये एकूण ४६ हॅण्डपंप असून त्यापैकी २२ हातपंप बंद आहेत. हीच परिस्थिती शहराची असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

कोरोना महामारीच्या दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने, गेल्या सहा महिन्यांचे पाणी बिल अदा करण्यात न आल्याने, एमआयडीची पाणी थकबाकी वाढली आहे. यामुळे महापालिकेवर केंव्हाही पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्याच्या मदतीने ४५० कोटी पेक्षा जास्त किंमतीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली. मात्र योजनेचा फज्जा उडून सर्वत्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे. पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसू नये म्हणून महापालिका बंद पडलेले हातपंप दरवर्षी दुरुस्ती केले जाते. दुरुस्तीवर कोट्यवधीचा खर्च केल्यावर अर्धेअधिक हातपंप बंद असल्याचे उघड झाले आहे. हातपंपच्या दुरुस्तीवर व इतर कामावर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी मागितल्याने, पाणी पुरवठा विभागात खळबळ इडली आहे. 

हातपंपाची दुरुस्तीचे संकेत

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी शहरातील हातपंप, विधुत पुरवठा याबाबतची माहिती घेण्याचे संकेत दिले. पाणी टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून उपाययोजना सुरू करून बंद पडलेले हातपंप सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे