शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
4
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
5
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
6
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
7
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
8
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
9
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
10
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
11
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
12
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
13
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
14
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
15
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ
16
रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ
17
महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित
18
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
19
१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या
20
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत

मीरा भाईंदर शहरातील २४ हून अधिक जुन्या विहिरी होणार पुनरुजीवित

By धीरज परब | Published: March 07, 2024 7:08 PM

Mira Bhayandar : मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत त्या कामांची सुरवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

मीरारोड -  मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत त्या कामांची सुरवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

मीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा त्यातच अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद राहतो . एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना पाणी टंचाई व बाहेरून पाणी विकत घेण्याचा भुर्दंड पडतो . त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुर्नजीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी नागरिकांच्या उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करण्याची मागणी आ . सरनाईक यांनी चालवली होती. 

अनेक पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होतोय. तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण होऊन  पाण्याला दुर्गंधी येते. तसेच आतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. अश्या विहरींची साफसफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . ७ मार्च रोजी मीरा गावठाण, महाविष्णू मंदिराशेजारील विहीर व मस्कर पाडा, काशीमीरा येथील या दोन विहिरींच्या कामाची सुरवात आ. प्रताप सरनाईक  यांच्या हस्ते करण्यात आली .

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हासंघटक निशा नार्वेकर, १४६ ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर,  मिरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंह, महिला संघटक’’ पूजा आमगावकर, उपजिल्हाप्रमुख विकास पाटील,  , रामभवन शर्मा, युवासेना  ठाणे पालघर  निरीक्षक स्वराज पाटील, माजी नगरसेविका संध्या पाटील, वंदना पाटील, उपशहरप्रमुख ऍड बाबासाहेब बंडे,  कमलाकर पाटील, राजु पाटील, शिवाजी पानमंद, उपशहरसंघटक गिता रॉय, शहरसमन्वय संगिता खुणे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

सर्वच विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात  खोदाई करून साफसफाई व त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील.  सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. विहिरीचे कठडे नव्याने बांधून, प्लास्टरिंग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रील लावण्यात येणार आहे. विहिरींच्या वर जलशुद्धीकरण सयंत्र लावण्यात येणार आहे. हे यंत्र पूर्णतः सौर उर्जेवर चालणारे असेल. इनलेट पॅरामीटर्स वर आधारीत वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू गाळण्याची प्रक्रिया कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, यु.व्ही. प्रणालीचा समावेश केला आहे जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य व शुद्ध असे पाणी उपलब्ध होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर