शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

महावितरणकडून बदलापुरात मान्सूनपूर्व कामांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:30 AM

बदलापूर : पावसाळा तोंडावर आलेला असतानादेखील महावितरणने बदलापूर शहरातील विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांची छटाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे ...

बदलापूर : पावसाळा तोंडावर आलेला असतानादेखील महावितरणने बदलापूर शहरातील विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या वृक्षांची छटाई अद्यापही केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे.

पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतानाच बदलापूरमध्ये मात्र अजूनही महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलेले दिसत नाही. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांत अनेक ठिकाणी मोठमोठ्या झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडकून पडल्या आहेत. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यापूर्वी बदलापुरात नालेसफाई करणे, विद्युत तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे अशा प्रकारची कामे पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अजूनही कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडकल्याने पावसाळ्यात विद्युतपुरवठा खंडित होऊन एखादा मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.

मागील आठवड्यात आलेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही भागांत तब्बल दोन दिवस विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मात्र यातून कोणताही बोध महावितरणने घेतलेला दिसत नाही. कारण आजही अनेक ठिकाणी विद्युततारांना झाडांचा स्पर्श होत असल्याचे पाहायला मिळत आहे, तर अनेक ठिकाणी विद्युतवाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडलाय. जर महावितरणने वेळीच या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली नाही तर येत्या पावसाळ्यात बदलापूरकरांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येणार आहे.

----------------