शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

मुंबईकरांना मिळणार मुबलक पाणी, तानसा धरण कोणत्याही क्षणी भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:34 AM

पावसाचा जोर कायम असल्याने भातसा, बारवीच्या पाणीसाठ्यातही वाढ

ठाणे-वासिंद : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे,  तर भातसा, बारवी, आंध्रा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा आदी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

सर्वांत मोठ्या  भातसा धरणाची सध्याची पाणी पातळी १२४.२८ मीटर असून ५२६.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठा आहे. या धरणात आज रोजी तब्बल ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर धरणाची पाणी पातळी १५९.६९ मीटर झाली असून, या धरणात ७८.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी ६८.५२ मीटर झाली आहे. या धरणात ६८.२४ टक्के पाणीसाठा आहे. 

तानसा धरणात आज १२९.५१ (८९.२७ टक्के) दलघमी साठा तयार झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या या धरणाची पाणी पातळी   १२७.८१ मीटर झाली आहे. 

भातसा धरणात ५५.९१ टक्केच पाणी

शहापूर तालुक्यातील मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात हवा तसा पाऊस झालेला नाही. धरणाची भरून वाहण्याची पातळी १४२ मीटर आहे. सद्य:स्थितीत पाणीपातळी १२४.२८ म्हणजेच ५५.९१ टक्के आहे. 

गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे  धरणाखालील व नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. पाण्याचा विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. महसूल व पोलिस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी