शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

महापालिकेचे डम्पिंगबाबत लेखी उत्तर, उल्हासनगराला २०२५ पर्यंत डम्पिंगचा फास 

By सदानंद नाईक | Published: July 13, 2024 3:59 PM

म्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले.

उल्हासनगर : डम्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. या उत्तराने डम्पिंगचा फास नागरिकांच्या भोवती दीड वर्ष राहणार असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा टाहो फोडत डम्पिंग हटावची मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी करून, नेताजी चौकात आमरण उपोषण केले होते. शहरातील डम्पिंग केंव्हा हटविणार? कुठे स्थलांतरित करणार? आज त्या जागेची काय स्थिती? असे प्रश्न विचारले होते. महापालिकेचे सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांनी उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर यांचा वालवली गाव हद्दीत ८ एकर जागेत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहत असल्याचे सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ नंतर पूर्ण झाल्यावर त्याजागी शहरातील डम्पिंग स्थलांतरित करणार असल्याचे लेखी उत्तर उपोषणकर्ते काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांना दिल्यावर साळवे यांनी उपोषण मागे घेतले.

 महापालिकेच्या लेखी उत्तराने शहरातील खडी खदान येथील डम्पिंग सन-२०२५ नंतर हटणार असल्याचे उघड झाले. त्यामुळे कमीतकमी दीड वर्ष खडी खदान परिसरातील २० हजार पेक्षा जास्त नागरिकांना डम्पिंगचा त्रास सहन करावा लागणार आहे. डम्पिंगला हिवाळा व उन्हाळ्यात आग लागत असल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी यापूर्वी डम्पिंग हटावसाठी रस्ता रोखो, धरणे आंदोलन, उपोषण, महापालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेच्या उत्तराने डम्पिंगचा फास दीड वर्ष कायम राहणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून दीड वर्ष मरणयातना सहन करायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर