शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महापालिकेचे डम्पिंगबाबत लेखी उत्तर, उल्हासनगराला २०२५ पर्यंत डम्पिंगचा फास 

By सदानंद नाईक | Updated: July 13, 2024 16:00 IST

म्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले.

उल्हासनगर : डम्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. या उत्तराने डम्पिंगचा फास नागरिकांच्या भोवती दीड वर्ष राहणार असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा टाहो फोडत डम्पिंग हटावची मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी करून, नेताजी चौकात आमरण उपोषण केले होते. शहरातील डम्पिंग केंव्हा हटविणार? कुठे स्थलांतरित करणार? आज त्या जागेची काय स्थिती? असे प्रश्न विचारले होते. महापालिकेचे सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांनी उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर यांचा वालवली गाव हद्दीत ८ एकर जागेत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहत असल्याचे सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ नंतर पूर्ण झाल्यावर त्याजागी शहरातील डम्पिंग स्थलांतरित करणार असल्याचे लेखी उत्तर उपोषणकर्ते काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांना दिल्यावर साळवे यांनी उपोषण मागे घेतले.

 महापालिकेच्या लेखी उत्तराने शहरातील खडी खदान येथील डम्पिंग सन-२०२५ नंतर हटणार असल्याचे उघड झाले. त्यामुळे कमीतकमी दीड वर्ष खडी खदान परिसरातील २० हजार पेक्षा जास्त नागरिकांना डम्पिंगचा त्रास सहन करावा लागणार आहे. डम्पिंगला हिवाळा व उन्हाळ्यात आग लागत असल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी यापूर्वी डम्पिंग हटावसाठी रस्ता रोखो, धरणे आंदोलन, उपोषण, महापालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेच्या उत्तराने डम्पिंगचा फास दीड वर्ष कायम राहणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून दीड वर्ष मरणयातना सहन करायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर