शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मांडा महापालिकेत की ग्रा.पं.त?

By admin | Published: June 08, 2015 11:20 PM

अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे.

उमेश जाधव, टिटवाळाअपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळेच या प्रभागाची ही अवस्था अशी असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची स्थापनेपासून मांडा (कोळीवाडा) हे गांव पालिकेच्या अ प्रभागाचे प्र.क्र ५ म्हणून घोषीत करण्यात आले. या प्रभागाचा गेली २५ वर्षात पाहिजे तसा विकास झाला नाही. येथून लगतच्या वासुंद्री, सांगोडा, कोंढेरी इतर गांवातील नागरीकांना प्रवास करतांना वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायत काळातील गावातील तुटलेली व घाणीने भरलेली गटारे यामुळे आरोग्याच्या प्रश्नाने रहिवासी हैराण होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन याच गटारातून गेल्याने लिकेज होऊन गटाराच्या दूषित पाण्याचा पुरवठा होण्याच्या घटना सतत घडत आहेत. गटारांच्या कामासाठी महिन्याभरापासून तेजस्विनी पॅलेस समोर खोदकाम करून ठेवले आहे. उमा दर्शन सोसायटीसमोर देखील तीच अवस्था. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता पावसाळा तोंडावर आल्याने याचा मोठ्या प्रमाणात नागरीकांना त्रास होणार आहे. जागोजागी पसरलेल्या कचऱ्याचे ढिगारे उचलण्यास पालिका प्रशासन असमर्थ असल्याची ओरड नागरीक करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातच सध्या पालिकेचे कामकाज चालते. तेच टेबल, त्याच खुर्च्या आणि तीच कपाटे. आजतागायत या कार्यालयाचा कायापालट करण्याता प्रयत्न ना स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाने केला नाही. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटल्याची ओरड नागरिक करत आहेत. पालिका प्रशासन फक्त नागरिकांकडून कर वसुलीचे काम मात्र इमानदारीने करत आहे. रस्त्याच्या कामाचेही तेच. नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी वारंवार प्रशासनाकडे ठेकेदाराच्या मनमानी कामासंदर्भात फक्त तक्रारी केल्या आहेत. प्रशासन या ठेकेदारास पाठिशी घालत असल्याचा कांगावा देखील सरनोबत करत आहेत. या प्रभागाचा विकास होण्याकरिता अद्याप १५ वर्षाचा कालावधी देखील कमी पडेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदानिसनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटला आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सर्वात जास्त प्रशासनाता निधी आणनारा मि नगरसेवक आहे. जवळ जवळ मांडा च्या विकासा करिता मि कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. परंतू पालिका प्रशासन फाईल मंजूर करेणे, टेंडरींग करणे व निधी देण्यास विलंब लावत आसल्यामुळेच विकास कामांना विलंब होत आहे. - बुधाराम सरनोबतनगरसेवक