शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बर्थडेत न आल्याच्या रागातून तरुणांचा खून, आरोपीला अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार, कुटुंबाचा पवित्रा

By सदानंद नाईक | Updated: October 10, 2023 18:50 IST

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर: बर्थडेला न आल्याच्या रागातून मित्राने पोटात चाकूने वार केलेल्या प्रदीप वर्मा या तरुणांचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलांच्या खुन्याला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वडीलासह नातेवाईकांनी घेतल्याने, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर पाण्याच्या टाकी परिसरात रामबाबू वर्मा हे कुटुंबासह राहतात. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांचा प्रदीप नावाचा मुलगा घराबाहेर उभा असतांना ओळखीचा मित्र लोलो उर्फ सोहेल खान याने बर्थडे पार्टीला आला नाही, या रागातून प्रदीप वर्मा या तरुणांच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच त्याला कोणी बचावासाठी आलातर, मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. 

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी प्रदीप यांच्यावर प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केल्यानंतर, खाजगी रुग्णालयात हलविले. १९ दिवसांच्या झुंजीनंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वडील रामबाबू यांच्यासह नातेवाईकांनी जो पर्यंत पोलीस आरोपीला अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.

तसेच उपचारावर ७ ते ८ लाख रुपये खर्च करूनही मुलगा न वाचल्याची खंत वडील रामबाबू वर्मा यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला आला नाही यारागातून ओळखीच्याच मित्राने प्रदीप वर्मा या तरुणांचा खून केल्याने, गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलीसांनी घटनेच्या १९ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक केली नसल्याने, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी