शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 7:47 PM

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे .

मीरारोड - मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . देशातील जनता महागाई , भ्रष्टाचार ,  शेतकरी आत्महत्या, मुली - महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी ने पिचली आहे . राफेल विमान घोटाळ्या प्रकरणी मोदी हे राहुल गांधी यांना घाबरून संसदेतून सुद्धा पळत आहेत . जनतेने मोदींना घरी बसवण्या चा निश्चय करून टाकला आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा कोकण विभाग निरीक्षक बी.एन. संदीप यांनी केली . 

मीरा रोड येथील अस्मिता कॉलेज मध्ये काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते . यावेळी संदीप बोलत होते . आमदार रामहरी रुपनवार, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राजेश शर्मा,  मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते आदी शिबिरात सहभागी झाले होते . 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी चा काळ, ब्रिटिश राजवटीत झालेली आंदोलने.  नेत्यांनी दिलेले बलिदान, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस शासन काळात झालेली क्रांती, घेतलेले महत्वपुर्ण  निर्णय, झालेला विकास आदींची माहिती राजीव साहू,चैतन्य रेड्डी, विनोद नायर या वक्त्यांनी करून दिली. पक्षाचे नगरसेवक, सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांच्या सह १२०० सक्रिय कार्यकर्त्यानी भाग घेतला.  

आलिशान लाखो रुपयांचे कोट घालणाऱ्या मोदींवर राहुल यांनी टीकेची झोड उठवताच मोदी कोट घालायला घाबरतात .  अंबानी व मोदीं बद्दल राहुल बोलतात म्हणून मोदी अंबानींच्या लग्नाला जायला घाबरले .  राफेल वर राहुल बोलतायत म्हणून उत्तर देण्या ऐवजी  मोदी संसदेतून सुद्धा पळ काढत आहेत . मोदी हे राहुल पासून घाबरून पळत असल्याने ते चोर आहेत हे स्पष्ट असल्याचा आरोप संदीप यांनी केला.    

मोदींनी लोकांना खोटी आश्वासने देत फसवणूक करून  सत्ता मिळवली . आणि आम्ही देखील काँग्रेस काळात केलेल्या जनहिताच्या कामांचा प्रचार व प्रसार करायला कमी  पडलो म्हणून हरलो .  आज मोदींच्या राज्यात  अराजकता माजली असून लहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून अंबानी, अदानी सारख्या बड्या उद्योजकांना मोदी हजारो कोटींचा फायदा मोदी करून देत आहेत असे संदीप म्हणाले . 

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर