शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

By रणजीत इंगळे | Published: September 30, 2022 5:45 PM

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे.

ठाणे- खासदार सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती वाढविण्याच्या गप्पा मारणाऱ्या नरेश म्हस्के यांनाच स्मृतीभ्रंश झालेला आहे. कारण, त्यांनी सन 2005 मध्ये नारायण राणेंसोबत जाताना  केलेली गद्दारी आणि आपल्याच पक्षाचे रवींद्र फाटक यांना 2014 मध्ये पराभूत करण्यासाठी केलेल्या कुरापती म्हस्के विसरले आहेत. त्यांना अल्झायमर झाला आहे. त्यामुळेच त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचारांची गरज आहे,  असा प्रतिटोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. 

सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती कमजोर झाली असून त्यांना टाॅनिक पाठवू, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती. त्याचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. परांजपे यांनी, म्हस्के यांचा उल्लेख फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते , असा उल्लेख करून सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती किती दांडगी आहे, याचा पुरावा संसदेत जाऊन म्हस्के यांनी शोधावा. आपल्या 13 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना आठवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावरच लोकांचे सर्वात जास्त प्रश्न संसदेत  मांडणाऱ्या,  सर्वात जास्त चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रियाताई या महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळेच सुप्रियाताई यांच्यावर टीका करणार्‍या नरेश म्हस्के यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला परांजपे यांनी हाणला. 

म्हस्के यांना विस्मृतीचा आजार म्हणजेच अल्झायमर झाला आहे, त्यामुळे मला म्हस्केंबद्दल सहानुभूती आहे.  सन 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत जाऊन म्हस्के यांनी गद्दारी केली होती. ही गद्दारी ते विसरत चालले आहेत. पण, त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच त्यांना क्षणभर विश्रांती या हाॅटेलातून परत आणले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हस्केंना पुन्हा शिवसेनेत घेतले होते.  त्यानंतर , सन 2014 च्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने म्हस्के हे रुसून घरात बसले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली असली तरी त्यांना जे करायचे होते तेच केले. अन् म्हस्केंनी  शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना पराभूत केले.   हा सर्व गद्दारीचा इतिहास ते विसरले आहेत. पण, ठाणेकर नागरिक त्यांचा हा इतिहास विसरलेले नाहीत. त्यामुळे म्हस्केंचा अल्झायमर बरा करण्यासाठी आता त्यांना टाॅनिकची नाही तर बड्या मानसोपचारतज्ज्ञाकडून वस्तूनिष्ठ उपचारांची गरज आहे. आपण मागेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विनंती करून एक बेड राखीव ठेवण्याची विनंती केली होती. आता पुन्हा एकदा हात जोडून बेड राखीव ठेवण्याची विनंती करतो, असे परांजपे म्हणाले. 

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपला नंबर लागावा,  यासाठीच ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रियाताई यांच्यावर बेछूट आरोप करीत आहेत. त्यांचा हा सूर्यावर थुंकण्याचा केविलवाना प्रयत्न  होत आहे. सुप्रियाताई योग्यच बोलल्या आहेत. हे सरकार पन्नास खोक्यांचे आहे. या सरकारचा मुंबई ते सुरत ते गुवाहाटी ते गोवा आणि नंतर शपथविधी हा प्रवास महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला माहित आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदारकीसाठीचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न पाहता, नरेश म्हस्के यांची तब्येत ठिक व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो, असेही परांजपे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे