शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केली होती मात
2
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
3
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
4
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
5
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
6
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
7
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
8
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
9
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
10
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
11
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
12
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
13
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
14
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
15
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
16
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
17
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
18
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
19
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
20
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     

राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 3:23 PM

मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे.

मुंब्रा - मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. आजवर या रत्यावर शेकडो मुंब्रावासियांना जीव गमवावा लागला आहे. आजही या रस्त्याच्या परिसरात राहणारे हजारो रहिवाशी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढीत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा बायपास रस्ता नसून खुनी बायपास रस्ता बनला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विरोधात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्ला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते पनवेल असा हा संतप्त मुंब्रावासियांचा मोर्चा असणार आहे. त्यामध्ये लाखो मुंब्रावासीय सहभागी होणार आहेत. 

मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता खुनी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंब्र्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन जीवितहानी आटोक्यात यावी यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. येथून होणाऱ्या जड वाहतुकीचा फटका नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने गाड्या चालविणाऱ्यांना मोठे कसब करून रस्ता पार करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आजवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष आणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलने केले. मात्र तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. आता पक्षाने पुन्हा हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक विभागाला ८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देत इशारा दिला आहे. ८ ऑक्टोंबर पर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर ९ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथील हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवा अध्यक्ष अशरफ शानु पठाणने माजी वेतन किमान आयोग के अध्यक्ष तथा  राज्यमंत्री सैय्यद अली अशरफ़, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नईम खान, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, मेराज खान, जफर नोमानी, मेरेशवर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख,साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मुंब्रा कौसा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सादिक शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान तथा पैरंट बाडी महिला कौसा ब्लॉक अध्यक्षा रिनी रिजवी, युवा महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी हा मोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्व मुंब्रावासीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शमीम खान,  अशरफ़ शानु पठाण यांनी केले आहे. हा हल्लाबोल मोर्चा कौसा दोस्त अपार्टमेंट स्थित पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जाणार असून मोर्चाकरिता बसची व्यवस्था केली आहे.