शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

राष्ट्रवादीचे रवी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:49 IST

वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले उद्योजक रवी पाटील यांच्यावर सहा ते सात जणांनी सळई तसेच चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आसनगाव येथे घडली.

शहापूर / कसारा : वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले उद्योजक रवी पाटील यांच्यावर सहा ते सात जणांनी सळई तसेच चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आसनगाव येथे घडली. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजलेले नाही.भिवंडी मतदारसंघातील शहापूर-किन्हवली येथील काँग्रेसचा प्रचारदौरा आटोपल्यानंतर घरी जात असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज विशे, मिलिंद देशमुख, रवींद्र पाटील आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास चेरपोली येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. पाटील यांनी त्यांची गाडी आसनगाव येथील एका हॉटेलजवळ ठेवली होती. त्यामुळे संजय निमसे आणि मिलिंद देशमुख यांनी त्यांना तेथे सोडले आणि ते निघून गेले. मात्र, गाडीचा टायर पंक्चर झाल्याचे जाणवल्याने पाटील खाली उतरले असता, अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.दरम्यान, सरलांबे येथील शिवाजी अधिकारी यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. शिवाजी अधिकारी यांना विचारले असता, या घटनेत माझा हात असल्याचा उल्लेख केल्याबाबत आपल्यालाही आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले. पाटील हे माझे मित्र असून, हल्ल्याचे नेमके कारण ठाऊक नाही.निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने पाटील यांच्यावर शहापूरची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.>... तरीही कारवाई नाहीरवींद्र पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एकदोघांना ओळखले होते. पाटील यांनी त्यांची नावे शहापूर पोलिसांना दिली. मात्र, शहापूर पोलीस याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाटील कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात येत आहे.