शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

निधी अभावी जेतवन नगर उपेक्षित

By admin | Published: June 09, 2015 10:49 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील प्र.क्र .७ जेतवन नगरची भौगोलिक दृष्ट्या व्याप्ती मोठी आहे.

उमेश जाधव, टिटवाळाकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील प्र.क्र .७ जेतवन नगरची भौगोलिक दृष्ट्या व्याप्ती मोठी आहे. यात जेतवन नगर, तिप्पना नगर, एनआरसी कॉलनी, बल्याणी, ऊंभर्णी, मोहिली आदी लोकवस्त्या तसेच काही गावांचा समावेश होतो. या सर्व लोकवस्त्यांचा विकास साधण्याकरिता नगरसेवक मयूर पाटील यांनी पालिका प्रशासनाशी विकास कामासंदर्भात पाठपुरावा करून प्रभागाचा विकास साधण्याचा अपुरा प्रयत्न केला आहे. तर बल्याणी गावाचा बहिष्कार उठवून त्याला पालिकेत समाविष्ट केले.येथे काही विकास कामे झाली आहेत. परंतु उर्वरीत कामांसाठी निधी नसल्याची सबब सांगून प्रशासन असहकार्य करीत आहे. दुसरीकडे शहरी भागातील प्रभागांना निधी कसा काय दिला जातो या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उत्तर देण्यास टाळाटाळ करतात. या प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊन नागरी वस्त्या निर्माण झाल्या आहेत. या वस्त्यांचा विकास कधी होणार असा नाराजीचा सूरही या प्रभागात आहे. तर पावसाळा ऐन तोंडावर आला असताना या प्रभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अशा स्थितीत नगरसेवक काय करतात? असा नागरीकांचा सवाल आहे. प्रभागाचा विस्तार भोगौलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. दहा कोटीच्या विकास कामांच्या फाईल पालिका प्रशासनास पाठविल्या आहेत. त्या मंजूर होण्यास विलंब लागत असल्याने विकास कामे थांबली आहेत.- मयूर पाटील, नगरसेवक, प्र.क्र .७ जेतवन नगर.आदिवासी वस्तीचा विकास, प्रभागाती पायवाट, गटारे, बल्याणीतील नवीन शाळा निर्मिती, उंभर्णी आणि टिप्पन नगर शाळांची दुरूस्ती, तलावातील गाळ काढणे, रस्त्यांवर दिवाबत्ती, नविन पाईप लाईन,रोहीत्र मंजूरी अशा प्रकारची छोटी कामे केली आहेत. मात्र मोठ्या विकास कामांच्या नावाने मात्र, ठणाणा आहे.