शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकऱ्यांनी अडचणी सोडविण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज - अंकुश माने 

By सुरेश लोखंडे | Updated: September 5, 2022 12:41 IST

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठाणे : अत्यल्प भूधारक शेतक-यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहिरीवर अवलंबून राहता येत नाही कारण विहीर किंवा बोअरवेल मारून तिथे पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यासाठी अस्तरीकरणासह शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जागेच्या अभावामुळे शेततळे करता येत नसेल तर सामूहिकपणे एकत्र येऊन शेततळे उभारावे, यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे मिळणाऱ्या शेततळे अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कारंद तालुका अंबरनाथ येथे आयोजित 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमावेळी केले. 

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात अधिकारी वर्ग शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत व त्यांच्याशी चर्चा करून यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने अंबरनाथमधील कारंद येथे भेट देऊन रत्नागिरी ८ या वाणांची चारसुत्री पद्धतीने केलेली भात लागवडची पाहणी केली. 

भात पिक परिस्थितीची पाहणी केली. किड रोग उपाय योजनाबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. वाकड्याची वाडी येथे शेतकरी चर्चा सत्र झाले. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मोगरा लागवड, बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड, शेततळे, मत्स्य शेती याबाबत माहिती माने यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

याचबरोबर, पीएमकिसान अंतर्गत केवायसी करणे, ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे जतन करून इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला आवश्यक विजेची सोय, पाण्याची कमतरता, अत्यल्प जमिनी, बाजारभाव याबाबत अडचणी मांडल्या. या कार्यक्रमाला उल्हासनगर तालुका कृषीअधिकारी विठ्ठल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते आदींसह कृषी सहायक सचिन तोरवे, अनिता नेहे, जयश्री साठे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी