शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 9, 2024 19:32 IST

पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ठाणे : पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ठाणे महानगरपालिका, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “विकास पत्रकारिता: शासन संवाद” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

ठाणे महानगरपालिका आयुक्त आभिजित बांगर म्हणाले की, शासन सेवेत पत्रकारांची महत्वाची भूमिका असते. शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत. पत्रकारांचा प्रतिसाद हा नि:ष्पक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे. कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी “समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता” या विषयावर तसेच, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ञ प्रा. श्रीकांत सोनावणे यांनी “डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन केले.सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. या कार्यशाळेस राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे