शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:04 AM

जनमानसात संघटना बळकट करण्याचे आवाहन

कल्याण :  एकमेकांची उणीदुणी काढू नका, अंतर्गत गटबाजी नको, कुरबुरीही नको, टीमवर्क हवे अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मंगळवारी कानपिचक्या लगावल्या. स्थानिक पातळीवर पक्ष क्षीण झाला आहे. पक्ष वाढला पाहिजे. केडीएमसीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, जनमानसात जाऊन काम करा, पक्ष संघटन बळकट करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

पश्चिमेतील खडकपाडामधील एका क्लबमध्ये मंगळवारी विशेष बैठक पार पडली. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षक म्हणून टोपे आणि आमदार विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, सुभाष पिसाळ, प्रमोद हिंदूराव, रमेश हनुमंते आदी स्थानिक नेत्यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना टोपे म्हणाले, कल्याण डोंबिवलीत प्रत्येक जिल्ह्यातून लोक राहायला आले आहेत. संघटन मजबूत असणे गरजेचे आहे. हाच बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. जनतेसाठी काम करा. त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतोच. संघटन बळकट होण्यासाठी कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.

लवकरच जिल्हाध्यक्षांची निवड

रिक्त असलेल्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलताना टोपे यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असे बैठकीत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी जिल्हाध्यक्षपद भूषविलेल्या रमेश हनुमंते यांच्या कामाचे कौतुकही केले. पक्ष संकटात असताना हनुमंते यांनी पक्षवाढीचे काम केले. त्यांनी आता वरिष्ठ पातळीवर पक्षाचे काम करावे अशी नेत्यांची इच्छा असल्याचे टोपे म्हणाले.

शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदासाठी पसंती

कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीत बहुतांश जणांनी टोपे यांना निवेदने दिली आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात यावी, असा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.‘

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपे