शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:23 IST

कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून विकसित केला नाही.

कल्याण : कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून विकसित केला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेतली नाही. त्यामुळे या सोसायट्यांत राहणाऱ्या त्रस्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली असून, आयोगाने त्याची दखल घेतली आहे.मंगेशी इलाइट डी, मंगेशी फ्लोरा, ओम पॅलेस, गॅलेक्सी रेसिडेन्सी या पाच सोसायट्यांना जोडणारा अंतर्गत रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात आहे. विकास आराखड्यानुसार हा १२ फुटी रस्ता विकसित करायचा आहे. तो विकसित केला नसल्याने नागरिकांना वळसा घालून मुख्य रस्त्याकडे यावे लागते. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोसायट्यांमध्ये राहणाºया दोन हजार नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. तसे निवेदन नागरिकांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते. आयोगाने त्याची गंभीर दखल घेत हा प्रश्न तातडीने मार्गी लावून, नागरिकांना मतदानावरील बहिष्कारापासून परावृत्त करावे, असे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना सूचित केले आहे.सोसायटीतील रहिवासी विनायक गावडे यांनी सांगितले की, यावेळी नागरिकांना महापालिकेकडून केवळ आश्वासन नको, तर ठोस काम हवे आहे.>बारावेप्रकरणी आज बैठककल्याण-डोंबिवली महापालिकेने बारावे येथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्याला विरोध करत, बारावे हिल रोड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील ५२ सोसायट्यांमध्ये राहणाºया २५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहिष्काराचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांशी चर्चा करण्यासाठी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह आमदार नरेंद्र पवार उपस्थित राहणार आहे. या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, तर बहिष्काराच्या निर्णयावर नागरिक ठाम आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी