शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

By सुरेश लोखंडे | Updated: April 1, 2024 16:09 IST

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. या टंचाईग्रस्त गांवपाड्यांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी रविवारी प्रत्यक्ष शहापूरला खास भेट देऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. तालुक्यातील एकही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहू नये,अशी दक्षता घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तंबी देऊन चांगलेच धारेवर धरले.

'शहापूर तालुक्यातील २५ गांवपाडे तहानलेली' या मथळ्याखाली लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी रविवारी शहापूरचा ग्रामीण, दुर्गम भाग गाठला आणि पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांची पहाणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. यावेळी टँकर ग्रस्त ९१ गाव पाड्याची माहिती उघकीस आली. या समस्यांवर त्वरित उपाययोजना करा, अशा सुचना ही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे, त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करा आणि एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करा,असेही त्यांना यावेळी आदेश दिले.

शहापूर पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, शहापूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, उप अभियंता विकास जाधव, स्वच्छ भारत मिशनचे एबीडीओ पंडित राठोड आदींसह ग्रामस्थ माेठ्यासंख्येने उपस्थित हाेते. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे यावेळी शिसोदे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे