शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:58 IST

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे.

किन्हवली - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. या तडकलेल्या भातशेतीमुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतावर अनेक रोग पडले आणि १५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भातजमिनी तडकल्या. परिणामी, भातपिके कोमेजली.येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र भातशेतीच्या उत्पन्नावर मोठी आफत येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाअभावी शेतीची अशीच स्थिती राहिली, तर यावेळी भातपिके जळून जाण्याची स्थिती आहे. या परिस्थितीत शेतीला पावसाची आवश्यकता असून आता भाताच्या आत दाणा तयार होत असताना पाण्याची नितांत गरज आहे. सोसायटीचे कर्ज काढून शेतकºयांनी शेती लावली असून विकत बियाणे आणि खते मारून तयार केलेल्या भातशेतीवर पावसाने दडी मारल्याने करप्या, बगळ्या हे रोग पडतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पावसाअभावीभात शेती तडकलीभातसानगर : शहापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जोमाने वाढलेली भात पीके उन्हाने तडकल्याने शेतकरी धास्तावला आहे.या तडकलेल्या भात शेतीमुळे आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर येवून ठेपला आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी आशा असताना गेले काही दिवसापासून शेतावर अनेक रोग पडलेले असतानांच आता गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भात जमीनी तडकल्याने भात पीके कोमेजुन जावू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.आता शेतकºयांचे लक्ष पावसाकडे असून पाऊस कधी पडतो अशी चिंता त्यांना लागली आहे. कारण सध्याच्या परिस्थिति शेतीला पावसाची आवश्यकता आहे.सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी भातशेतीची कामे वेळीच केली. चालू वर्षी पीक चांगले येईल, या आशेवर असतानाच पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास शेतकºयांच्या तोंडून निघून जाणार आहे.- मल्हारी चंदे, शेतकरी / शेतकरी मार्गदर्शककिन्हवली परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे व आता भातपीक पोटरीवर आहेत. पावसाने दडी मारल्यावर पिकांचे नुकसान होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

टॅग्स :Farmerशेतकरीshahapurशहापूर