शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

ठाण्यातील २५२ झोपडपट्ट्यांना वालीच नाही!

By admin | Published: January 09, 2016 2:11 AM

मुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे

अजित मांडके,  ठाणेमुंबईत धारावीच्या पुनर्विकासासाठी प्राधिकरणाने जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु, ठाणे शहरात असे एकही नियोजन प्राधिकरण नसल्याने ठाणे शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास रखडला आहे. त्यासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या. परंतु, त्या अपुऱ्याच ठरल्या. शहरात एसआरडी, म्हाडा आणि आता एसआरए, एमएमआरडीए अशा विविध प्लॅनिंंग अ‍ॅथॉरिटी असल्याने शहरातील झोपडपट्टीचा विकास नेमका कोणत्या माध्यमातून करायचा, यावर अद्यापही तोडगा निघू न शकल्याने पुनर्विकास रखडला आहे.एका बाजूला डोंगर, वन विभाग, एमआयडीसी, खाडीकिनारा यांची सोबत घेत ठाणे शहर उभे आहे. शहराचा परिसर १२६.२३ चौरस किलोमीटर असून यात ६२ चौरस किमीचा हरित पट्टा आहे. ठाणे पालिकेने झोपडपट्टीमुक्त ठाण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून शहराचा विकास करताना वाल्मीकी विकास एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प योजना (वॅम्बे), शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयूपी), झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी), राजीव आवास योजना (आरएवाय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, सार्वजनिक-खाजगी सहभाग, बांधकाम हक्क हस्तांतरण, संक्रमण निवारे, रात्रनिवारे, परवडणारी घरे आणि एसआरए असे पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरेवगळता अन्यत्र झोपड्यांच्या विकासासाठी झोपु योजनेपलीकडचे नेमके कोणते पर्याय राबविता येऊ शकतात, याचा अभ्यास दोन वर्षे सुरू आहे, पण त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. आजघडीला ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील ५३ टक्के जनता आजही झोपडपट्टीत राहते. लोकसंख्या वाढीचा दर पाहता २०३१ मध्ये हीच लोकसंख्या ३४ लाखांच्या घरात जाईल. हा विचार करून पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यात सध्याची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार गृहीत धरण्यात आली असून यातील नऊ लाख ८३ हजार जनता झोपडपट्टीत राहते. त्यात दोन लाख ४५ हजार ७०९ कुटुंबांचे वास्तव्य आहे. शहरातील २५२ झोपडपट्ट्यांचा विकास मधल्या काळात एसआरएच्या माध्यमातून करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, शहराला दोन लाख ३० हजार घरांची गरज आहे. यासाठी तब्बल २१ हजार ९२० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात या योजनेचे एकही पाऊल पुढे पडू शकलेले नाही.विविध योजनेतून दिलेली घरे...आतापर्यंत पालिकेने बॉम्बे या योजनेतून १,२४० पैकी ३२० घरे बांधली आहेत. तसेच एसआरडी योजनेतून १७,४९२ पैकी तीन हजार, पीपीपी माध्यमातून ३३८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून २७४, बांधकाम हस्तांतरण ६१६, संक्रमण निवारे १५,०२० पैकी १,४४८, रात्रनिवारे ७५, परवडणारी ३,४२० घरे बांधली आहेत. बीएसयूपीच्या ६,५४९ घरांपैकी ३,४२३ घरे बाधंण्यात आली असून ३,१२६ घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही योजना आता बंद झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून झोपड्यांचा विकास फसल्याने रहिवाशी हताश आहेत.