शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयाला लागली वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:46 AM

पंकज पाटील अंबरनाथ : नगरपालिकेची प्रशासकीय इमारत डबघाईला आलेली असतानाच आता या इमारतीला आणखीन एका महत्त्वाच्या समस्येने वेढले आहे. ...

पंकज पाटील

अंबरनाथ : नगरपालिकेची प्रशासकीय इमारत डबघाईला आलेली असतानाच आता या इमारतीला आणखीन एका महत्त्वाच्या समस्येने वेढले आहे. संपूर्ण पालिकेच्या इमारतीला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे संपूर्ण कार्यालयातील महत्त्वाच्या फाइल्स खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची इमारत १९७८ला तयार करण्यात आली असून, ही इमारत आता धोकादायक स्थितीत आहे. पालिकेच्या वतीने नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असले तरी अद्याप ते काम पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकेला जुन्या इमारतीतूनच कामकाज करावे लागत आहे. मात्र जुन्या इमारतीमध्येदेखील आता नवनवीन समस्या उद‌्भवत आहेत. आता संपूर्ण पालिकेच्या कार्यालयाला वाळवी लागली असून, या वाळवीमुळे महत्त्वाच्या फाइल्सदेखील खराब झाल्या आहेत. अंबरनाथ नगरपरिषद येथील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात वाळवीचा सर्वाधिक प्रभाव असून, या वाळवीने कार्यालयातील निम्म्याहून अधिक फाइल्स नष्ट केल्या आहेत.

महत्त्वाच्या फाइल्स वाळवीच्या विळख्यात सापडल्याने त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीदेखील चिंतित आहेत.

जन्म-मृत्यू नोंदणीसोबतच पालिकेतील बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, एवढेच नव्हे तर मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयालादेखील वाळवी लागली आहे. तळ मजल्यावरील सर्व कार्यालयांना आणि तेथील अनेक फाइल्स, कागदपत्रांनाही वाळवी लागली आहे. हीच परिस्थिती पहिल्या मजल्यावरील आस्थापना विभाग, अकाउंट विभाग आणि नगरविकास विभागाच्या कार्यालयातदेखील दिसते आहे.

वाळवीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ज्या अधिकाऱ्यांवर शहर विकासाची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयातील वाळवीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येत्या काही दिवसात वाळवीवर नियंत्रण मिळवता न आल्यास पालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता आहे.