शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे

By नितीन पंडित | Updated: August 9, 2024 17:46 IST

मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गाचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालक, प्रवासी,चाकरमानी विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवास यातनामय झालेला असताना मुंबई नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याने नागरिक व प्रवाशांची अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले. या पाहणी दौऱ्यात आमदार शांताराम मोरे,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून यावर उपाय म्हणून अवजड वाहने वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्या पूर्वी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली.मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी येण्याच्या काही तास आधी पडघा टोल व्यवस्थापन व रस्ते विकास महामंडळ व बांधकाम प्रशासनाकडून तातडीने खड्ड्यांवर थातुर मातुर मलमपट्टी करण्यास सुरवात केली होती.या घाईघाईच्या खड्डे भराईच्या कामाचा स्थानिक नागरिकांनी प्रशासन टोल व्यवस्थापन कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbhiwandiभिवंडी