शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

जिल्ह्यात अवघा ५०,२६० लसींचा साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:37 AM

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अनेक केंद्रे बंद होती. ...

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अनेक केंद्रे बंद होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील लसीकरण मोहीम ठप्प होती. ठाण्यात ५६ पैकी केवळ ११ केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. उर्वरित ४५ केंद्रे बंद होती. जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारी केवळ ५० हजार २६० लसींचा साठा शिल्लक होता. यामध्ये कोव्हिशिल्डचा अवघा ४१ हजार ८२०, तर कोव्हॅक्सिनचा ८ हजार ४४० लसी शिल्लक आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण कसे करायचे, असा पेच निर्माण झाला आहे.

ठाण्यासह इतर महापालिकांनीदेखील लसींचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, अगदी कमी साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. भिवंडीकडे कोव्हॅक्सिनचे ४५० तर कोव्हिशिल्डचे २३२० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे ९० आणि कोव्हिशिल्डचे ३ हजार ६५० डोस आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे ५०० डोस असून, कोव्हिशिल्डचे ६ हजार २८० डोस, मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे २ हजार ७१०, कोव्हिशिल्डचे ९ हजार ४००, नवी मुंबईत कोव्हॅक्सिनचे १ हजार ८७० व कोव्हिशिल्डचे ५ हजार ३६० डोस शिल्लक आहेत. उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सिनचे ६४०, कोव्हिशिल्डचे ३ हजार ५९० डोस शिल्लक आहेत. ग्रामीण भागात कोव्हॅक्सिनचे २ हजार १८० आणि कोव्हिशिल्डचे ११ हजार २२० डोस शिल्लक आहेत. याच शिल्लक डोसमधून शुक्रवारी लसीकरण करण्यात आले. त्यामुळे शनिवारी लसींचा साठा मिळाला नाही, तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर येणार आहे.

..............

ठाण्यात शुक्रवारी ४५ केंद्रे बंद

ठाणे महापालिका हद्दीत शुक्रवारी ११ केंद्रे सुरू होती. या केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु टोकननुसारच लसीकरण केले जात होते. शहरातील उर्वरित ४५ केंद्रे बंद होती.

................

जिल्हा रुग्णालयातही लसीकरण बंद

ठाणे महापालिका हद्दीतील केंद्रांवर लस नसल्याने ठाणेकर जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतात. मात्र तीन दिवसांपासून येथील केंद्र बंदच आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे निश्चित झाल्याने त्यानुसार जिल्हा रुग्णालयात मंडप उभारण्यात आले आहेत. रोजच्या रोज १ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची त्यांची तयारी आहे. परंतु साठाच मिळत नसल्याने लसीकरण कसे करायचे, असा पेच जिल्हा रुग्णालयासमोर आहे.

.........................