शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मागवा... कटिंग सँडविच, कटिंग पिझ्झा

By admin | Published: April 13, 2017 3:27 AM

यापुढे हॉटेलात गेल्यावर तुम्हाला कटिंग सँडविच मिळेल, कटिंग पिझ्झा मिळेल... एवढेच कशाला हाफ पाणीपुरी, अर्धा रगडाही मागवता येईल, अशी तिरकस प्रतिक्रिया बुधवारी

ठाणे : यापुढे हॉटेलात गेल्यावर तुम्हाला कटिंग सँडविच मिळेल, कटिंग पिझ्झा मिळेल... एवढेच कशाला हाफ पाणीपुरी, अर्धा रगडाही मागवता येईल, अशी तिरकस प्रतिक्रिया बुधवारी ठाणे-डोंबिवलीतील हॉटेलचालकांनी दिली. अन्न वाया जाऊ न देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ छेडताच केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी हॉटेलमध्ये मागेल तेवढाच पदार्थ देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. आधीच महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूबंदीच्या निर्णयाचा फटका सोसत असताना सरकारच्या या नव्या निर्णयामुळे हॉटेल चालवणे कठीण होईल, अशी अगतिकताही त्यांनी व्यक्त केली. पण आधीच अडचणीत आल्याने प्रतिक्रिया देऊन आणखी अडचणीत आणू नका, असे सांगत त्यांनी नावानिशी या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.एखाद्याला किती भूक आहे, यावर हॉटेलमधील पदार्थाची क्वान्टिटी (प्रमाण) ठरत नाही. तर एखादा पदार्थ एखादी व्यक्ती साधारण किती खाऊ शकेल यावर त्याचे प्रमाण ठरलेले असते. आॅर्डर घेतल्यावर आम्ही, आमचे वेटर अनेकदा तो पदार्थ किती जणांना पुरेल तेही सांगतो. बऱ्याचदा एक कप चहा किंवा कॉफी घेतल्यावर सोबत रिकामा कप देतो किंवा एखादे सूप, सरबत, मिल्क शेक ‘वन बाय टू’ करून दिले जाते. उरलेले अन्न पार्सल करून-बांधूनही दिले जाते. पण एखाद्याने अर्धवट खाऊन अन्न टाकले, तर त्याला हॉटेलचालक काय करणार? येथे वैयक्तिक सवय-संस्कार महत्त्वाचा ठरतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिल्लक राहिलेले अन्न पूर्वी अनेक हॉटेलचालक गरीबांना वाटत असत. त्यातून त्यांचे पोट भरत असे. त्यांना चांगले अन्न मिळत असे. पण हे अन्न खराब झाले, तर त्यातून विषबाधेचा धोका उद््भवू शकतो हे लक्षात आल्यावर ते बंद झाले. शिजवलेले जे पदार्थ टिकू शकतात, ते आम्हीही उकीरड्यावर टाकत नाही. आम्हालाही अन्नाची किंमत कळते, असा मुद्दा हॉटेलचालकांनी मांडला. (प्रतिनिधी)गोदामातील नासाडी थांबवा : सरकारी गोदामात धान्य साठवताना अन्नाची मोठी नासाडी होते. शेतमालाला भाव न मिळाल्याने कृषी मालाची, दूध-भाजीपाल्याची नासाडी होते, यावर आधी उपाय योजा आणि नंतर हॉटेलमधील पदार्थांचे प्रमाण ठरवा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. हॉटेलच्या थाळीत किती पुऱ्या वाढायच्या हे ठरवण्यापेक्षाही देशासमोर अनेक मोठे प्रश्न असल्याचा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला. आठवला... वरीचा भात लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी तांदळाच्या टंचाईवर उपाय म्हणून वरीचा भात (भगर) खाण्याचे आवाहन केले होते. तेव्हा हॉटेलमध्ये तो मिळत होता. इतरवेळीही एखाद्या पदार्थाची टंचाई असेल तर हॉटेलचालक त्याचा नक्की विचार करतात, याचा दाखला त्यांनी दिला.मर्यादित थाळीची सोय आधीपासूनच उपलब्ध एखाद्याला कमी भूक असेल, तर त्याच्यासाठी मोजके पदार्थ असलेली मर्यादित थाळी मागवण्याची सोय खूप आधीपासून उपलब्ध आहे.प्रसंगी चटणी, सांबार नको असेल; भातही कमी हवा असेल तरी मिळतो. फक्त मेन्यू कार्डवर तसा उल्लेख नसतो. आता तो करावा लागेल, असे खानावळचालकांनी सांगितले.लग्नकार्य, राजकीय नेत्यांची वाढदिवसाची पार्टी, भोजनावळी येथे वाया जाणाऱ्या अन्नाचे काय? तेथे आधी हा नियम लागू करा, यावर त्यांनी बोट ठेवले.