शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

६० हजारांपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी अनेक रिक्षाचालकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे हे काम करण्याचे मोठे आव्हान कल्याण आरटीओसमोर असून, आतापर्यंत ६० हजारांपैकी १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्यासंदर्भातील नोंदी कशा करायच्या, हा मोठा प्रश्न आरटीओसमोर आहे.

उपप्रादेशिक अधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. आधारकार्ड लिंक करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे उघडली आहेत. शुक्रवारपासून हे काम करण्यात येणार होते. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते. त्यापाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. सुरुवातीला रिक्षाचालकांना इंटरनेटची आवश्यक लिंक मिळत नव्हती. मिळाली तर सतत हँग होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे रिक्षा संघटनांनी नाराजी दर्शवली होती. कल्याण उपप्रादेशिक परिवहनची बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे. त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे; पण त्यात परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन्स, बॅच आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून, प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असेही अधिकारी म्हणाले.