शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 09, 2022 1:42 PM

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे.

ठाणे : सध्या फॉरवर्डच्या काळात तरुण पिढीचे शब्दांशी नातं तुटत आहे. दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या नावाने होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा शब्दांशी नाते जोडले जाईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. दरम्यान, कै. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात पराग बद्रिके व कनिष्ठ गटात अनन्या म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दहा हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. 

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील के. बी. पी. महाविद्यालयात भरविलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा समारोप झाला. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुगदरे, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, मंदार टिल्लू आदींनी काम पाहिले. या स्पर्धेत वरिष्ठ गटात यश पाटील याने द्वीतीय, श्रुती बोरस्तेने तृतीय आणि विवेक वारभुवन याने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले तर कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकावर रागिणी भोसले, तृतीय क्रमांकावर प्रियांका दळवी आणि उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी माने यांना बक्षीस देण्यात आले.

उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे. तर पाच ते सहापट ऐकले पाहिजे. वक्तृत्वासाठी आत्मविश्वासही महत्वाचा असून, शब्दांची मांडणीही योग्य पद्धतीने करावी, अशी सुचना उपाध्ये यांनी तरुणांना केली. प्रत्येक भाषणाच्या वेळी आपल्या समोर जनसमुदाय कोणत्या पद्धतीचा आहे. ते ध्यानात घेण्याबरोबरच सखोल अभ्यास करून भाषण करावे. अशा पद्धतीने तुम्हा वक्तृत्वात यश मिळेल, असे उपाध्ये यांनी सांगितले.

महाविद्यालयातील तरुण-तरुणींना मनातील विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देण्याचा मुख्य उद्देश ठेवून स्पर्धा भरविण्यात आली होती. उत्तम वक्तृत्वाच्या माध्यमातून मुलांना भविष्य घडविता येऊ शकते. यापुढील काळातही समन्वय प्रतिष्ठानतर्फे तरुणांच्या प्रगतीसाठी स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी संजीव नाईक, माधवी नाईक यांचीही भाषणे झाली. आकाश राऊत यांनी सुत्रसंचालन व स्पर्धेचे नियोजन केले. 

'वसंतराव डावखरेंनी अनेक वक्ते घडविले'

विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर कार्य करीत असताना वसंतराव डावखरे यांनी सभागृहातून अनेक यशस्वी वक्ते घडविले. एखादा आमदार चांगल्या पद्धतीने बोलत असल्यास, त्याला ते भाषणासाठी वेळ वाढवून देत असत. तर एखादा सदस्य मुद्द्यावरून भरकटला, तर ताबडतोब विषय थांबवित असत. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक नवोदीत आमदारांना आत्मविश्वास वाढला होता, अशी आठवण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी वसंतराव डावखरेंच्या भाषणाचे वैशिष्ट्य नमूद केले. सभा असो वा बैठक, ते बोलताना सर्व समुदायाला सामावून घेत होते. त्यामुळे त्यांचे भाषण लोकांच्या मनाला भिडत होते, असे म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे