शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली.

- सुरेश लोखंडे ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली. ‘मतदान करणारच’ असे त्यांचे ‘संकल्पपत्र’ स्वाक्षरीसह भरून घेण्यात आले. परंतु, त्यापासून आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव होताच निवडणूक यंत्रणेने ते पत्र भरून घेण्यास आता मनाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकवर्गद्विधा मन:स्थितीत दिसून येत आहे.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यापैकी एक ‘संकल्पपत्र’ हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून मतदार आईवडिलांना संकल्पपत्र दिले जात आहे. त्याद्वारे शिक्षण देत असल्याचे आभार मानण्यासह देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे, असा संकल्प करण्याची विनंती या विद्यार्थ्यांकडून आईवडिलांना करण्यात आली. या पत्रास उत्तर म्हणून या लोकसभा निवडणुकीत मी अवश्य मतदान करेन आणि माझ्या परिचितांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करेन, असे पालकांचे ‘संकल्पपत्र’ नाव, पत्ता व स्वाक्षरीसह शाळेत जमा करावे लागले. जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हे संकल्पपत्र शाळेत जमा केले आहे. काही विद्यार्थ्यांनी ते अद्याप शाळेत दिले नाही.परंतु, आता विद्यार्थ्यांच्या या संकल्पपत्रास मनाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव निवडणूक यंत्रणेस झाली आणि विद्यार्थ्यांकडून मतदानासाठीचे ‘संकल्पपत्र’ घेण्यात येऊ नये, असे जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींना भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण विभागाने कळवले आहे.>तोंडी आदेशामुळे संभ्रमनिवडणुकीच्या या काळात तोंडी आदेशास स्थान नसल्यामुळे शिक्षकवर्ग गोंधळात सापडला आहे. जिल्ह्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘संकल्पपत्र’ घेऊ नये, असे दूरध्वनीद्वारे कळवल्याचे मेसेज शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांकडून ‘संकल्पपत्र’ घेण्याचे थांबवून विद्यार्थ्यांद्वारे परिवारातील मतदान जनजागृतीला रोख लागला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे