शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

उद्याने, खेळाची मैदाने विकसित होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने ३४३ आरक्षित भूखंड विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार त्याची कार्यवाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने ३४३ आरक्षित भूखंड विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार त्याची कार्यवाही आयुक्तांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीमच महापालिका प्रशासनाने हाती घेतली असून वृक्षारोपणाच्या माध्यमातून हे भूखंड संरक्षित केले जाणार आहेत. त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या सहभागातून हे भूखंड विकसित करत मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून आतापर्यंत आलेल्या प्रशासकांकडून अशाप्रकारचे पाऊल यापूर्वी कधीच उचलले गेले नसल्याने या भूखंडांचा वापर भलतेच लोक भलत्याच कामासाठी करीत होते. त्याला आता आळा बसणार आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात सात सेक्टर विभागले आहेत. या सात सेक्टरमध्ये तब्बल १ हजार २९२ आरक्षित भूखंड आहेत. खेळाची मैदाने, उद्याने, सामाजिक, सांस्कृतिक केंद्र, शाळा, वाचनालये यासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरक्षित असलेले भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ताब्यात असलेले ३४३ भूखंड हे विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले. या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने त्यांच्याभोवती भिंत बांधणे आवश्यक आहे. या भूखंडांची जबाबदारी ही मालमत्ता विभागाकडे असते. त्यांच्याकडून तसा प्रस्ताव तयार झाल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून संरक्षक भिंत बांधून हे भूखंड संरक्षित केले जाऊ शकतात. त्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे आयुक्तांनी ३४३ भूखंड संरक्षित करण्यासाठी ते आधी ताब्यात घेऊन त्यांच्याभोवती वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. त्याकरिता त्यांनी समाजिक संस्थांना आवाहन केले आहे. आयुक्तांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, मॉर्निंग वॉक ग्रुप, रनर्स ग्रुप, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, कल्याण जनता सहकारी बँक, कुणबी समाज प्रतिष्ठान, आय नेचर फाऊंडेशन, इनरव्हील क्लब डोंबिवली पूर्व या संस्था पुढे आलेल्या आहेत. अन्य संस्थाही पुढे येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आयुक्तांच्या हस्ते आंबिवली आणि टिटवाळा येथील आरक्षित भूखंडावर दोन दिवसांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले. या जागा मुलांना खेळण्यासाठी दिल्या जाणार आहेत. शहरात मुलांना आणि खेळाडूंना मैदाने नाहीत. प्रत्येक प्रभागातील हे भूखंड हे खेळण्यासाठी व अन्य सामाजिक उपक्रमासाठी संस्था पुढे आल्यास दिले जाऊ शकतात. त्यामुळे भूखंडाचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि खेळाला प्रोत्साहन हे तीन उद्देश साध्य होणार आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला नव्हता. सर्व आरक्षित भूखंड हे विकसित झाल्यास त्याचा उपयोग बहुविध कामासाठी केला जाऊ शकतो. त्यातून अनेक सामाजिक संस्थाही महापालिकेशी जोडल्या जातील. सर्व समावेश आरक्षणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या इमारतीत पोलीस ठाणे सुरू करण्यास महापालिकेने जागा दिलेली आहे.

--------------------------------------

२७ गावांत ५०५ आरक्षित भूखंड

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या २७ गावांपैकी १८ गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ९ गावे महापालिकेत आहेत. २७ गावांत एकूण ५०५ आरक्षित भूखंड आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११ आरक्षित भूखंड हे महापालिकेच्या ताब्यात आलेले आहेत. उर्वरित ४९४ भूखंड हे अद्याप ताब्यात आलेले नाहीत. गावे वगळण्याच्या निर्णयावर काय निकाल लागतो त्यानंतर २७ गावांतील आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविली जाऊ शकते. २७ गावांचा आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. एमएमआरडीएने जाणीवपूर्वक जास्त आरक्षणे ही २७ गावात टाकल्याचा आरोप संघर्ष समितीकडून वारंवार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात हरकतीही घेतलेल्या आहेत.

फोटो-कल्याण-वृक्षारोपण