शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

एसटी डेपोंत ‘पाताललोक’,  ठाण्यात गर्दुल्ले, मद्यपी यांच्या पार्ट्या : बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुली हेच ठरतात लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:10 IST

ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुण्यातील स्वारगेट येथे एका तरुणीवर एसटी डेपोच्या परिसरात बलात्कार झाल्याने समाजमन हेलावले. मात्र, ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील एसटी डेपोंमध्ये कधीही अशीच एखादी गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडू शकते इतकी भीषण परिस्थिती आहे.

ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात. 

कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील एसटी स्टँडचे नूतनीकरण सुरू असल्याने तेथे ना सीसीटीव्ही आहेत, ना पोलिस चौकी. या परिसरात रात्री वारांगना, तृतीयपंथी, चोरटे यांचा खुलेआम वावर असतो. वर्दळीची वेळ सोडली तर दुपारी आणि रात्री महिला, मुलींनी तर एसटी डेपोच्या परिसरात पाऊल ठेवू नये, अशीच ठाण्यात परिस्थिती आहे. पुण्यातील  घटनेमुळे राज्यातील एसटी डेपोंची किती दुरवस्था असेल, याची प्रचिती येते.

खराब स्वच्छतागृहेठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांनी एसटी प्रवास कमी केला आहे. एकतर हा वर्ग स्वत:च्या मोटारी घेऊन कोकणापासून कोल्हापूर, सोलापूर किंवा अगदी समृद्धी महामार्गावरून नागपूरपर्यंत जाऊ शकतो. एसटी बसच्या खडखडाटापेक्षा चार पैसे जास्त मोजून लक्झरी स्लिपर क्लासने जाण्याचा पर्याय या प्रवाशांनी स्वीकारला आहे. परिणामी अत्यंत गोरगरीब वर्ग किंवा ज्यांना दररोज प्रवास अपरिहार्य आहे असा वर्ग एसटीचा वापर करतो.त्यामुळे एसटी डेपोंकडे दुर्लक्ष झाले आहे. एसटीची आर्थिक स्थिती खराब आहे. त्याचाही फटका सुविधांना बसला आहे. तुटकी आसने, खराब स्वच्छतागृहे यामुळे प्रवासी प्रवास टाळतात. 

घरी जायला एसटीच, पण... ठाणे व कल्याण ही रेल्वे प्रवासाची मोठी केंद्र आहेत. देशाच्या अन्य भागातील मेल, एक्स्प्रेस गाड्या मध्यरात्री या दोन स्टेशनवर प्रवाशांना सोडतात. येथून प्रवासी मीरा-भाईंदर, विरार, नालासोपारा,भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली वगैरे शहराकडे जातात. कल्याण व ठाणे स्थानकाबाहेर एसटी डेपो आहेत. रात्री उतरणाऱ्या प्रवाशांचा  गैरफायदा रिक्षाचालक घेतात. अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात.  त्यामुळे गरीब प्रवाशांना घर गाठण्यासाठी एसटीचाच पर्याय असतो. डेपो परिसरात गर्दुल्ले, मद्यपी,भामट्यांचा वावर असतो. त्यामुळे पुण्यापेक्षा ठाण्याची परिस्थिती वेगळी नाही, असे प्रवाशांचेच म्हणणे आहे. 

टॅग्स :state transportएसटी