शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

खड्डे, धुळधाणीमुळे वाहनचालक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:58 AM

खडीकरणाचा उतारा ठरतोय निरुपयोगी

डोंबिवली : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपाठोपाठ आता त्यातील उडणाऱ्या धुळीमुळे सध्या नागरिक चांगलेच बेजार झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने केडीएमसीने डांबराचे पॅच मारण्यास सुरुवात केली असली, तरी काही महत्त्वाचे रस्ते अजूनही खड्ड्यांतच आहेत. दरम्यान, या खड्ड्यांतील खडी इतरत्र पसरल्याने त्रासात अधिकच भर पडत आहे.शहरातील मुख्य रस्ते व चौकांची खड्ड्यांमुळे दयनीय स्थिती झाली आहे. सध्या डांबरीकरणाची कामे सुरू झाली असली, तरी त्याला वेग आलेला नाही. त्यामुळे बहुतांश रस्ते आजही खड्ड्यांतच आहेत. मनसेने खड्ड्यांच्या मुद्यावर १ आॅक्टोबरला केडीएमसीच्या वर्धापनदिनी अभिनव आंदोलन केले होते. ज्या टिळक रोडवर आंदोलन झाले, तेथेही आज डांबर पडलेले नाही. दुसरीकडे ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याचीही खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे.या रस्त्याच्या एका मार्गिकेवर अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाकडून ही कामे संथगतीने सुरू असल्याने अनेक महिने ही मार्गिका वाहनांसाठी बंदच आहे.एमआयडीसीच्या निवासी भागातही खड्डे कायम असून, तेथील मुख्य रस्ते खड्ड्यांत गेल्याने धुळीच्या त्रासाने रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी इतरत्र पसरल्याने त्यावरून वाहने नेताना वाहनचालकांची विशेषकरून दुचाकीचालकांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान, खड्डे व धुळीतून मुक्तता होणार कधी, असा सवाल केला जात आहे....तर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढू - काकडेडोंबिवलीतील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा २० आॅक्टोबरला केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे.पूर्व-पश्चिमेतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, वाहने खड्ड्यांत आदळत आहेत. रिक्षाचालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याकडे युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी लक्ष वेधले आहे. रस्ते दुरुस्तीसंदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.