शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

लेखकांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ; राजेंद्र दर्डा यांनी ‘लिटफेस्ट’ची मांडली कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 6:45 AM

फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

ठाणे : अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांत ज्या कथेवर, कादंबरीवर चित्रपट बनतात, मालिका बनतात, त्या लेखकांना अवघ्या काही क्षणात पुरस्कार देऊन रवाना केले जाते. मात्र, लेखकांसाठी, पुस्तकांसाठी आज देशात कोणत्याही माध्यम समूहाकडून स्वतंत्रपणे पुरस्कार दिला जात नाही. फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

येत्या काही वर्षांत ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ हा साहित्य महोत्सवामध्ये परिवर्तित व्हावा, लोकमत लिटफेस्ट आकाराला यावे, त्यात वेगवेगळ्या भाषांची पुस्तके यावीत, देशभरातले लेखक, कवी त्या ठिकाणी यावेत आणि त्या व्यासपीठावरून मराठी साहित्याचा गौरव व्हावा, ही ‘लोकमत’ची इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.  ‘लोकमत’ने साहित्य पुरस्कारांची परंपरा सुरू केली. या आधीचे तीनही सोहळे पुण्यात झाले. त्यात श्याम मनोहर, द. मा. मिरासदार, रा. चिं. ढेरे यांचा गौरव ‘लोकमत’ने केला आहे, असे सांगून राजेंद्र दर्डा पुढे म्हणाले की, यंदा हा सोहळा ठाण्यात होतोय.

अनेकानेक अजरामर गीते लिहिणाऱ्या जनकवी पी. सावळाराम यांचे हे ठाणे. या ठाण्यात ‘लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा’ आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्हावा, यासारखा दुसरा कोणताही सुंदर योग नाही. ज्यांना ‘ज्ञानपीठ’ने गौरविले ते भालचंद्र नेमाडे यांना आपण ‘जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित करत आहोत, यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगून दर्डा पुढे म्हणाले की, नेमाडेंची भूमिका नेहमीच सुस्पष्ट, परखड आणि तत्वनिष्ठ राहिलेली आहे. नेमाडे यांनी आपल्या साहित्यसाधनेतून स्वतःचं वेगळेपण आणि स्वतंत्र भूमिका सातत्याने मांडली आहे. साहित्यासारख्या क्षेत्रात अनेकदा बुद्धिभेद करून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहत असतो. अशा वातावरणात स्वतःची ठाम भूमिका घेऊन ती सातत्याने मांडत राहणं यासाठी तपश्चर्या, साधना असावी लागते. उपस्थित साहित्यिकांचे आणि विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Lokmatलोकमत