शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:43 AM

जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डोंबिवली : ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ या आणि यासारख्या अनेक काव्यपंक्तींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी मधुकर जोशी (९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, डॉ. अविनाश, डॉ. शिरीष, जगदीश ही तीन मुले व डॉ. अलकानंद आणि अंजली या दोन मुली असा परिवार आहे.जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली स्मशानभूमीत अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील नीलकंठ हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वडिलांकडून साहित्याचे बाळकडू जोशी यांना मिळाले. जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांनी सहावीत असताना पहिली कविता ‘गांधीस वंदन’ (चंद्रकांता) ही कविता लिहीली. केंद्र सरकारच्या सेन्ट्रल एक्साईज विभागात काम करणारे जोशी १९८८ साली सेवानिवृत्त झाले. शास्त्रीय गायक डी. व्ही. पलुस्कर यांच्याशी जोशी यांचा परिचय झाला. पलुस्कर यांनी एचएमव्ही कॅसेट कंपनीचे संचालक जी. एन. जोशी यांच्याशी जोशी यांचा परिचय करुन दिला. १९५३ मध्ये आकाशवाणीवरून जोशी यांनी लिहिलेल्या भूपाळीचे प्रसारण करण्यात आले. जोशी यांच्या गीतांची पहिली रेकॉर्ड प्रकाशित झाली. या रेकॉर्डच्या एका बाजूला ‘मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ राधिकेचा राऊळी ये मोहना मधुसुदना’ हे होते. आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमाकरिता जोशी यांनी २१ सांगितीका लिहील्या होत्या. त्यातील ‘बाजीराव मस्तानी’ खूप गाजली होती. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र गाथा’ नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले होते. जोशी यांनी ९ ते १० हजार कविता लिहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन ‘गीत शिवायन’ यासह अनेक बालगीते त्यांनी लिहिली. लहान मुलांसाठी लिहिलेली ‘अशीच अमुची आई असती’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘नको ताई रूसू’, यासारखी हजारो गाणी जोशी यांच्या समृध्द लेखणीतून रसिकांच्या पसंतीस उतरली. कवीवर्य कुसुमाग्रज आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली. वयाच्या ८६ व्या वर्षीपर्यंत त्यांचे लिखाण सुरूच होते. जोशी यांच्या गीत लेखनाची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दखल घेऊन कौतुक केले होते. जोशी यांची ३५० गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.