शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

कवीच्या वयाबरोबर कवितादेखील वाढली पाहिजे : अशोक बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:14 IST

सहयोग मंदिरमध्ये कवयित्री सुजाता राऊत यांच्या ‘उगमाकडे जाताना’ या पहिल्या कवितासंग्रहाचे तसेच कवी गीतेश शिंदे

ठाणे : रंग जेव्हा बोलतो तेव्हा चित्र निर्माण होते आणि शब्द जेव्हा अबोल होतो, तेव्हा कविता निर्माण होते. कवी वयाने वाढतो तशी कवितादेखील वाढली पाहिजे, असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.

सहयोग मंदिरमध्ये कवयित्री सुजाता राऊत यांच्या ‘उगमाकडे जाताना’ या पहिल्या कवितासंग्रहाचे तसेच कवी गीतेश शिंदे यांच्या ‘निमित्तमात्र’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लेखिका डॉ. वीणा सानेकर यांनी या दोन्ही कवींच्या लेखनप्रवासावर आपले विचार व्यक्त केले. प्रकाशक नितीन हिरवे यावेळी उपस्थित होते. ‘उगमाकडे जाताना’ या संग्रहाचे मुखपृष्ठ साकारणारे, कार्यक्र माचे अतिथी रामदास खरे यांनी चित्रकलेच्या प्रवासाबद्दल, मुखपृष्ठाच्या निर्मितीबद्दल विवेचन केले. यावेळी राऊत म्हणाल्या, ‘शाळेच्या पाठपुस्तकात कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘बाहुली’ या कवितेने माझे भावविश्व तरल केले, समृद्ध केले. त्या कवितेत व्यक्त झालेल्या भावनांचा कल्लोळ अस्वस्थ करून गेला. जुन्यानव्या कवितांच्या अखंड वाचनाने मी समृद्ध झाले. ज्येष्ठ कवयित्री अरु णा ढेरे यांच्या भावस्पर्शी आणि निर्मळ कवितांचा परिचय पुढे कॉलेजजीवनात झाला. त्यांच्या कवितेने एक प्रकारचा समंजसपणा दिला. आयुष्याच्या खडतर टप्प्यांवर कवितेनेच मला तारले.’ याच सोहळ्यानंतर ‘अक्षय रजनी’ या कवितालेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यात एकूण १८४ स्पर्धकांनी भाग घेतला. विजय जोशी (डोंबिवली), रजनी निकाळजे (मीरा रोड), संकेत म्हात्रे (ठाणे), वर्षा गटणे (ठाणे), रवींद्र मालुंजकर (नाशिक), उत्तेजनार्थमध्ये मानसी चापेकर (रोहा), जुई जोशी (मेलबर्न), अलका कुलकर्णी (नाशिक), तर विशेष उल्लेखनीयमध्ये कुमार नंदन कार्ले (डोंबिवली) या नऊ विजेत्या कवींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन कवी गीतेश शिंदे यांनी, तर आभारप्रदर्शन तपस्या नेवे यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणे