शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 24, 2023 8:26 PM

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थीतीवर कवी बोलले तर कवींचेही महत्त्व वाढेल. आपल्या आजूबाजूला जे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे त्यावरही भाष्य होणे गरजेचे आहे आणि ते त्याचवेळेला होणे गरजेचे आहे. असलेल्या परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी त्याचवेळी कवी, साहित्यिक पुढे आले पाहिजे. कवींना महत्त्व प्राप्त व्हावे असे पाऊल त्यांच्याकडूनही उचलले गेले पाहिजे असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.

डॉ. नागेश कांबळे यांनी कवी कुसुमाग्रज यांचे अप्रकाशित साहित्य संकलित केले आहे. या अप्रकाशित साहित्याचे क आणि ख या दोन ग्रंथाच्या अखंड मालेचे प्रकाशन राज यांच्या हस्ते करण्यात आले. 

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. राज म्हणाले, कवी कुसुमाग्रज यांना मी बाळासाहेबांबरोबर भेटलो होतो. ती एकच त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आपण आपल्याच लोकांना मोठे करत नाही. आपली माणसे किती थोर होती हे परदेशात सांगितले जाते पण दुर्दैवाने ते आपल्याकडे सांगितले जात नाही. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी आपल्या भाषणात आपल्याकडे अज्ञानाचे महामेरु खूप आहेत असा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन करत राज यांनी ह्ल्लीच्या मंत्र्यांना तर काही माहीतच नसते. ते वर्तमानकाळात नसतातच. हे सांगताना कवी कुसुमाग्रज यांची पन्नाशीची उमर गाठली ही कविता राज यांनी सादर केली.

ही कविता प्रत्येकाच्या घरात लावली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला ती पाठवली पाहिजे असे आवाहनही केले. ही कविता मंत्रालयात लावली होती, जागा चुकली होती असे मिश्किलपणे म्हणाले. मराठी साहित्य इतर भाषांत यायला हवे. मराठीपण जगाला कळण्यासाठी साहित्यासारखी दुसरी गोष्ट नाही असे ते शेवटी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. कांबळे, ज्येष्ठ कवी बागवे, अरुण म्हात्रे, प्रकाशक सुदेश हिंगलासपुरकर, रावण पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक अभिजीत पानसे, अभय गाडगीळ, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पेडणेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, कौशल इनामदार यांनी कुसुमाग्रज यांच्या कवीता, साहित्याचे सादरीकरण केले. समीरा गुजर हिने सुत्रसंचालन केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे