शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:45 IST

मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे.  

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने शासनास दिलेल्या प्रस्तावा नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० फुटा पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास मंजुरी दिली. ठाणे, नवी मुंबई महापालिकेने सुद्धा तसा ठराव केला आहे. मीरा भाईंदरमधील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन सह पालिका विरोधीपक्ष नेते धनेश पाटील यांनी नागरिकांना कर माफ करण्यासाठी महासभेत ठराव करण्याची लेखी मागणी महापौर ज्योत्सना हसनाळे याना केली. त्यामुळे कोंडी झालेल्या सत्ताधारी भाजपाला येणाऱ्या २५ जानेवारी रोजीच्या महासभेत ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव आणावा लागला आहे. 

माजी आमदार नरेंद्र मेहतांनी ह्या प्रकरणी पालिकेत पत्रकार परिषद घेऊन, महाविकास आघाडी सरकार सह शिवसेना व दोन्ही आमदारांवर टीका केली. सरनाईक व जैन यांनी राजकारण करायचे म्हणून महापौरांना पत्र दिले असा आरोप केला. परंतु मेहतांनी एकीकडे मुंबईला मंजुरी दिली त्याचवेळी मीरा भाईंदर व अन्य कोणत्याही पालिकेचे नाव टाकून कर माफीचा आदेश मुख्यमंत्र्यांना काढता आला असता असे सांगताना दुसरीकडे मुंबई पालिकेने ठराव करून पाठवला मग मुख्यमंत्र्यांनी तो मंजूर केला व तसा आदेश काढून मालमत्ता कर माफ केला असे म्हटले . सरकार कडून काही नको महापालिका सक्षम आहे सांगताना दुसरीकडे  महासभेने मंजुरी दिली तरी आयुक्त दिलीप ढोले यांनी गोषवारा दिला नसल्याने ते मंजूर का विखंडित करायला पाठवतात? असा प्रश्न केला. सरनाईकानी स्वतःचा दंड माफ करून आणला तसाच ते नागरिकांच्या करमाफीला शासना कडून मंजुरी मिळवतील असा टोला मेहतांनी लगावला. 

मेहतांच्या शह नंतर सरनाईकांनी काटशह दिला आहे. त्यांनी ठाणे महापालिकेच्या महासभेत करमाफीसाठी झालेला राजकीय ठरावची प्रतच महापौरांना दिली आहे. ठाण्यात जसा प्रशासनाला विश्वासात घेऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमताने ठराव केला व प्रशासनाच्या सहमतीने तो शासनाकडे पाठवला असल्याने मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजपाने त्यांच्या पालिका प्रशासना कडून सकारात्मक अहवाल व प्रस्ताव घ्यावा सांगून ती मेहता व भाजपाची जबाबदारी असल्या कडे बोट केले आहे . शहरातील कष्टकरी लोकांना करमाफी मिळाली पाहिजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे.  परंतु आमच्या भूमिकेवर पालिकेतील भाजपच्या  सत्ताधारी नेत्यांनी, महापौर आदींनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकारण करून नागरिकांची फसवणूक करू नये असा टोला सरनाईकानी लगावला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर