शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

कृषी कायद्याआडून राजकारण- कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:58 PM

विराेधकांचा अराजक माजवण्याचा प्रयत्न

पालघर : दिल्लीतील आंदोलक शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही त्यांचे नेते हेका सोडण्यास तयार नाहीत. मोदी सरकारला अडचणीत आणून या आंदोलनाआडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा आरोप खासदार कपिल पाटील यांनी केला.केंद्राच्या कृषीविषयक कायद्याविषयी जनजागृती व्हावी व शंकांचे निराकरण मिडियाद्वारे व्हावे या दृष्टीने साेमवारी पालघरच्या शासकीय विश्रामगृहात खा. कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सुजित पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील, माजी आमदार पास्कल धनारे, मधुकर पाटील, पुंडलिक भानुशाली आदी उपस्थित होते.  शेतकरी सक्षम व्हावा, त्याचे उत्पन्न दुप्पट व्हावा असा प्रयत्न केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर कृषीखात्यामार्फत सुरू आहे.केंद्राच्या २०१३ चे कृषी बजेट १७ हजार कोटी होते ते आता २०१९-२० चे एक लाख ३४ कोटींचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता असताना बनले होते. तोच कायदा आता देशपातळीवर झाल्यास त्याला विरोध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जव्हार, मोखाडा या आदिवासीबहुल भागातील आदिवासी बांधवांना शेतातील मोगरा, भाजी, फळेविक्रीची यंत्रणा उभी नसल्याने रस्त्यावर अथवा आठवडाबाजारात विक्री करावी लागते. यावर खा. पाटील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच भाजप सरकार खाजगीकरणाच्या दिशेने जात अदानी-अंबानीसाठी हे करत असल्याबाबतचे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले.

‘लाेकभावना केंद्रापर्यंत पाेहाेचवू’देशात प्रत्येकाला सुविधा पाहिजेत. परंतु त्या सुविधा निर्माण करण्यासाठी एखादा प्रकल्प आणला की त्याला आपण विरोध करतो. एनराॅन प्रकल्पापासून हे आपण पाहत असून देशात एखाद्याला लीडर व्हायचे असेल तर शंभर माणसे जमवून विरोध दर्शविला की तुम्ही लीडर बनता. सध्या हेच सुरू असून वाढवण बंदराबाबत लोकांचा नेमका का विरोध आहे हे समजून घेताना केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टींचा विचार करूनच हा प्रकल्प आणला असेल, असे खासदारांनी सांगून लोकांच्या भावना केंद्रापर्यंत पोहाेचवू, असे स्पष्ट केले.