शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

प्रदूषण तीन वर्षांनी दूर होणार

By admin | Published: October 04, 2016 2:23 AM

डोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून

मुरलीधर भवार, डोंबिवलीडोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून प्रत्यक्ष वाहिन्या टाकण्याच्या कामाला तीन वर्षांचा काळ लागेल, असे प्रतिज्ञापत्र एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केले आहे. तोवर रासायनिक सांडपाण्याचे नेमके काय करायचे याचा तिढा सोडवावा लागेल. एमआयडीसीच्या प्रतिज्ञापत्रामुळे रासायनिक कारखान्यांचे धाबे दणाणले असून ७ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. डोंबिवली आणि अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता ते थेट नदी आणि खाडीत सोडले जाते. त्यामुळे भूसृष्टी, जलसृष्टीवर होणारे परिणाम आणि वाहून जाणाऱ्या सांडपाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला उद््भवलेला धोका अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरु आहे. लवादाने मागील सुनावणीवेळी एमआयडीसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने ते १ आॅक्टोबरला सादर केले आहे. वनशक्तीची या याचिकेवर गेली तीन वर्षे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान लवादाने केंद्रीय प्रदूषण मंडळ व राज्य प्रदूषण मंडळाची कानउघाडणी केली. त्यानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखान्यांना रासायनिक सांडपाणी बंद करण्याची नोटीस बजावल्याने त्या दिवसापासून कारखाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असल्याने लवादाने त्याची गंभीर दखल घेतली. कारखानदारांना पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्याची जबाबदारी, तिची देखभाल-दुरुस्ती ही एमआयडीसीची जबाबदारी आहे. ती एमआयडीसी पार पाडत नसल्याचा मुद्दा समोर आला आणि या सोयी सुविधा कधी पुरविणार, त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण एमआयडीसीला नोटीस बजावली आणि लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.