शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाळ्यापूर्वीची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:32 IST

रस्तेदुरुस्ती, गटारांची सफाई रखडणार

कल्याण : केडीएमसीतील मोठ्या नाल्यांच्या पावसाळापूर्व सफाई कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तर सोमवारी स्थायी समितीच्या सभेत रस्ते दुरुस्ती आणि छोट्या गटारींच्या सफाईची कामे मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. पण रविवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ही सभा होणार नसल्याने मंजुरीअभावी ही कामे पुरती रखडणार आहेत. आता मे २३ च्या मतमोजणीनंतर आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रस्तावांना मान्यता मिळेल. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या प्रारंभी कल्याण-डोंबिवलीकरांना पुन्हा खड्डेमय रस्त्यांचा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.मागील वर्षी रस्त्यातील खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला होता. लोकसभा निवडणूक आणि निवडणुकीची लागणारी आचारसंहिता पाहता लवकरात लवकर पावसाळयापूर्वीच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणावेत, असे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले होते. मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनीही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांचे कार्यादेश तातडीने देण्यात यावेत, असे पत्र शुक्रवारी महापौर विनीता राणे आणि आयुक्त गोविंद बोडके यांना दिले होते.सभापती म्हात्रे यांनीही प्रशासनाकडे फेब्रुवारीपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली. शनिवारी स्थायीची सभा पार पडली. तेव्हा खड्डे भरणे, डांबरीकरण करणे या रस्त्यांच्या दुरुस्तीसह छोेट्या गटारांची सफाई आदी आयत्या वेळेचे ३० कोटींचे १५ प्रस्ताव मंजुरीसाठी आणले होते. या प्रस्तावांचा गोषवारा अपूर्ण असल्याने सभापती म्हात्रेंनी ते प्रस्ताव प्रशासनाकडे पुन्हा पाठविले होते. सोमवारी सकाळी १० वाजता सभा लावण्यात आली होती. यात रस्ते दुरुस्ती आणि गटार सफाईचे असे ३० कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते पण रविवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा होऊ शकणार नाही, असे महापालिका प्रभारी सचिव संजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान, सभापती म्हात्रे यांनी केलेल्या आरोपावर ‘लोकमत’ने आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.विलंबाला प्रशासनाचा हलगर्जीपणा नडलागेल्या वेळी खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा रस्तेदुरुस्तीची निविदा प्रक्रिया फेब्रुवारीतच पार पडली होती. हे प्रस्ताव तातडीने स्थायी समितीकडे आणावेत अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या, मात्र त्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे पुन्हा रस्तेदुरुस्तीच्या कामांना खीळ बसली आहे.मागील वर्षी विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे विलंब झाला होता. आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर पावसाळ्याच्या तोंडावर प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया पार पडेल. खड्ड्यांमुळे बळी गेल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका