शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर

By नितीन पंडित | Published: May 18, 2024 9:20 PM

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

भिवंडी: मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभा म्हणजे तमाशा असून एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तेथे दुसरे काही झालेच नाही.पुढच्या पाच वर्षात काय करणारा हे कोणीही सांगितले नाही.पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे.त्यामुळे या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडला,नागरिकत्व सुद्धा सोडले. ज्यांची मालमत्ता ५० कोटी पेक्षा अधिक आहे. जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.

"शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकी नंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही," असे वक्तव्य देखील आंबेडकर यांनी यावेळी केले.

महायुतीच्या महाराष्ट्रात पाच ते सहा जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे.त्यामुळे जे चारशेचा क्लेम करीत होते,४८ जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्या पासून स्वतःला रोखत आहेत.ही लाट भाजपा विरोधात आहे.टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपाला बसणार आहे.त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील असेही आंबेडकर म्हणाले असून जे पी नड्डा यांच्या आर एस एस संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता,नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे.त्यासाठी आमचा आर एस एस बरोबर संबंध नाही असे भसवण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 प्रकाश आंबेडकर यांना वाहतूक कोंडीचा फटका दुचाकी वरून प्रवास 

भिवंडीत प्रचार सभे साठी येताना ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला आहे. कशेळी ते अंजुर फाटा दरम्यान अखेर त्यांनी आपल्या कारमधून उतरून दुचाकी वरून प्रवास करीत भिवंडी येथील सभास्थळ प्रचाराची वेळ संपण्यासाठी अवघे दहा मिनिट शिल्लक असताना गाठले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी