शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

‘ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:25 AM

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची ...

कल्याण : शहरातील प्रत्येक सोसायटीने ओला-सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प सोसायटीतच राबविल्यास नागरिकांच्याच पैशाची बचत होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील महावीरनगर सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शनिवारी शिंदे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारी राजेश कदम, भाजप माजी नगरसेविका सुनीता पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, ‘ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण ही काळाची गरज आहे. केडीएमसी दीड वर्षापासून शून्य कचरा मोहीम राबवत असून, आतापर्यंत साडेतीन हजार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे. मनपा हद्दीतील जवळपास ५० मोठ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेक सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास मनपावरील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा भार कमी होईल. मनपा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते; परंतु त्यावर खर्च होणारा पैसा हा नागरिकांकडून करातून गोळा केलेला असतो. प्रक्रियेवरील मनपाचे पैसे वाचणार म्हणजेच जनतेच्या पैशाची बचत होईल. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या सोसायट्यांनी ओला-सुका कचरा वर्गीकरणास सहकार्य करून शहर कचरामुक्त करण्याच्या मोहिमेस हातभार लावावा.’

--------------------------