शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
2
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
3
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
5
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
6
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
8
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
9
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
10
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
11
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
12
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
13
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
14
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
15
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
16
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
17
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
18
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
19
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
20
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा

एक करंजी लाखमोलाची, वंचितांसाठी उक्ती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 3:40 PM

आर्थिक दुर्बल घटकांतील वंचितांना मदत करण्यासाठी उक्ती फाउंडेशनने एक करंजी लाखमोलाची हा उपक्रम हाती घेतला आहे. 

ठळक मुद्देवंचितांसाठी उक्ती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रमउक्तीच्या माध्यमातून मदतीचा हात'एक करंजी लाख मोलाची' हा उपक्रम राबविला जाणार

ठाणे : आर्थिक दुर्बल घटकांच्या घरात अंधार असताना , आपल्या अंगणातील दिव्यांचा प्रकाश संवेदनशील मनांना टोचत राहातो.  त्यांचे दारिद्र्य पाहून मन व्यथित होत आहे. म्हणूनच त्यांच्याही घरात दिवाळीची स्नेहज्योत उजळावी , यासाठी उक्ती फाउंडेशन मदत करणार आहे. दारिद्र्याअभावी ज्या घरात दिवाळीची पणती पेटणार नाही, तेथे उक्तीच्या माध्यमातून मदतीचा हात पोहचविला जाणार आहे.

दिवाळी आली आहे. ठाणे, मुंबईसारखी शहरे दिव्यांच्या झगमगाटांनी न्हाऊन निघाली आहेत.  बाजारपेठा ग्राहकांच्या खरेदीने ओसांडून वाहत आहेत. शहरातील ज्येष्ठ, युवक आणि बच्चे कंपनी नव्या कपड्यात रुबाबदार दिसत आहेत. महिला-मुलींच्या अंगावरही महागडे कपडे पाहायला मिळत आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने नागरिकांच्या कानठळ्या बसणार आहेत तर घराघरात विविध फराळांचा घमघमाटही सुटणार आहे. पण हे सुख सगळ्यांच्याच अंगणात दिसणार आहे का? या आनंदापासून वंचित असलेल्या घटकांचे काय? असे प्रश्न मनाला अस्वस्थ करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील दुर्बल आदिवासी पाडे, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक, झोपडपट्टीत राहणारे आर्थिक दुर्बल घटक या सगळ्यांची दिवाळी उक्ती फाउंडेशन गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना फराळ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत करणार आहे. यासाठी समाजातील दानशूर  व्यक्तींकडून दान स्वरूपाने स्वीकारलेल्या वस्तू या दुर्बलांपर्यंत पोहचविणार आहे. संस्थेमार्फत उच्चभ्रू वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी विविध माध्यमातून संपर्क साधून त्यांना अशा वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जमा झालेल्या वस्तू गरजूंना दिल्या जाणार आहेत. फराळात तयार करण्यात आलेली एक करंजी, एक चकलीही लाखमोलाची मानून ती या घटकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. यासाठी ठाण्यात राहणाऱ्या तमाम इच्छुक नागरिकांनी त्यांच्या घरात दिवाळीसाठी तयार करण्यात आलेला फराळ, कपडे, अतिरिक्त भांडे आणि इतर सर्व प्रकारच्या वस्तू आमच्या संस्थेशी संपर्क करून दान कराव्यात असे आवाहन करीत आहोत. संस्थेच्या शेल्टरमध्ये या वस्तू आणून दिल्या जाऊ शकतात. अथवा संस्थेशी संपर्क साधून त्या आमच्या स्वयंसेवकांकडे द्याव्यात, असे आवाहन संस्थेच्या संचालिका गीतांजली लेले यांनी केले आहे. उक्ती संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात असून आदिवासी, बेघर आणि गरिबांची दिवाळीही सुखकर करण्याचा छोटासा प्रयत्न केला जात आहे. ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१८ या सप्ताहात 'एक करंजी लाख मोलाची' हा उपक्रम राबविला जाणार असून या सप्ताहात संस्थेकडे जमा झालेल्या सर्व वस्तू ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडा, बेघर नागरिक आदींपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. असेही गीतांजली लेले यांनी सांगितले. उक्ती फाउंडेशन ही संस्था २००९ पासून सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक आदी विषयावर काम करीत आहे. विशेषतः विशेष मुलांसाठी कार्य करीत आहे. बेघरांसाठी ठाणे महानगर पालिकेच्या मदतीने शेलटर होम चालवीत आहोत. जे नागरिक रस्त्यावर झोपतात ते या शेलटरमध्ये राहू शकतात असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकDiwaliदिवाळी