शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:54 PM

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे.

धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या ५०० चौ . फुटां पर्यंतच्या घरांना मालमता कर माफी म्हणजे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे . कारण नागरिकांना कर माफी देण्यास प्रशासनाने नकार दिला असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी शासना कडून अनुदान मिळाले तरच कर माफ करण्याचे ३० मार्चच्या महासभेत स्पष्ट केले आहे . त्यामुळे मुंबई प्रमाणे मीरा भाईंदर मधील घरांना करमाफी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे . तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह विरोधी पक्ष नेते धनेश पाटील आदींनी करमाफीची मागणी  केल्या नंतर  महापौर ज्योत्सना हसनाळे  यांनी महासभेत विषय घेतला होता . परंतु सत्ताधारी भाजपने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करताना शासन कडून अनुदान मागितले होते . 

वास्तविक मुंबई, ठाणे , नवी मुंबई ह्या महापालिकांनी कर माफीसाठी शासना कडून अनुदान मागितलेले नसताना मीरा भाईंदर पालिकेला शासन अनुदान देईल ह्याची शक्यता नाही याची कल्पना सत्ताधारी व विरोधकांसह प्रशासनाला सुद्धा असावी. भाजपा कडून, सेनेच्या आमदारांनी शासना कडून करमाफीसाठी अनुदान आणावे अशी भूमिका घेत सेने आणि शासनावर करमाफीचा चेंडू टोलवला . तर महापालिकेत सत्ता भाजपाची असून करोडोंची उधळपट्टी आणि बड्या थकबाकीदार , ठेकेदार आदीं कडील थकबाकी वसूल न करणाऱ्या भाजपाने नागरिकांना कर माफी देण्याची पालिकेची जबाबदारी झटकल्याची टीका शिवसेनेने केली होती . मुंबई , ठाणे , नवी मुंबई पालिकांनी शासना कडे अनुदान मागितले नाही कारण ती पालिकेची जबाबदारी असल्याचे सेनेने म्हटले होते . 

 

दरम्यान पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेचे १०९ कोटींचे नुकसान होणार असल्याने खर्च भागवणे अवघड होईल व करमाफी देणे उचित नाही असे स्पष्ट करत करमाफीला खीळ लावली .  त्यातच भाजपाने पालिकेच्या अर्थसंकल्पात देखील मालमत्ता करमाफीसाठी शासना कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये ५०० फुटां पर्यंतच्या घरांना करमाफी मिळणे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे. या आधी कोरोना काळात प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के करमाफी सुद्धा पालिकेने दिली नाही . परंतु दुसरीकडे बड्या थकबाकीदारांना मात्र तब्बल ७५ टक्के व्याज माफी देण्यात आली . 

राकेश शाह ( सभापती स्थायी समिती ) - महासभेतील  ठराव नुसार अर्थसंकल्पात शासन कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . शहरातील शिवसेनेच्या दोन आमदारांनी शासना कडून अनुदान आणल्या नंतर नागरिकांना मालमत्ता कर माफी दिली जाईल. धनेश पाटील ( विरोधीपक्ष नेते ) - मीरा भाईंदरच्या नागरिकांना करमाफी देण्याची भाजपाची नियत व दानत नाही . २२५० कोटींचा अर्थसंकल्प बनवणाऱ्या भाजपाला नागरिकांसाठी १०० कोटींची करमाफी द्यायची नाही. कारण त्यांना मनमानी ठेके देणे व उधळपट्टी करण्यात स्वारस्य आहे . या आधी कोरोना काळात सुद्धा नागरिकांना ५० टक्के करमाफी भाजपाने दिली नाही . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर