शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद! 

By सदानंद नाईक | Published: June 14, 2023 6:42 PM

आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

उल्हासनगर : शहरातील १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र देणाऱ्यांना जागेची सनद देण्यात येणार असून ३० जून पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन शासन आदेशानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले. आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

देशाची फाळणी झाल्यानंतर विस्थापित झालेल्या बहुसंख सिंधी समाजाला कल्याण जवळील ब्रिटिशकालीन बरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून विस्थापिताच्या वस्तीला उल्हासनगर नाव देण्यात आले. सुरवातीला उल्हासनगरची लोकसंख्या ९५ हजार होती. ती आता ९ लाखा पेक्षा जास्त झाली आहे. केंद्र शासनाने जमिनीची मालकी राज्य शासनाकडे हस्तांतरण केले. त्यानंतर जागेची मालकी हक्क (सनद) देण्यासाठी राज्य शासनाने, सन १९६५ पूर्वीचा पुरावा व इतर कागदपत्र मागितले असून आज पर्यंत ३५ हजार पेक्षा जास्त जणांना जागेची मालकी म्हणजे सनद प्रांत कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या नागरिकडे जागेचा पुरावा व इतर कागदपत्र आहेत. त्यांनी ते ३० जून पूर्वी प्रांत कार्यालयात विशिष्ट नमुन्यात पोच करावी. असे आवाहन शासनाच्या निदर्शनानुसार प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.

 शहरातील जागेवर वर्षांनुवर्ष राहणाऱ्या नागरिकांनी जागेची मालकीहक्क (सनद) घेऊन जावे. त्यासाठी शासन नियमानुसार प्रांत कार्यालयाकडे अर्ज करून जागेवर कब्जाचे कागदपत्र सादर करावे. जागेची मालकीहक्क प्रकार निकाली काढण्यासाठी शासन आग्रही असल्याचे प्रांत अधिकारी।कारभारी यांनी सांगितले. ५ हजार जणांना अद्यापही सनद देणे बाकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रांत कार्यालयाच्या वतीने राहत्या जागेची व खुल्या मात्र ताबा असलेल्या जागेची सनद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रांत कार्यालयाच्या आदेशानंतर अनेकांनी जागेच्या सनदसाठी अर्ज आल्याचे उघड झाले. ३० जून पर्यंत नागरिकांनी सनद साठी अर्ज करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे. 

जागेला आला सोन्याचा भाव शहरात जागेला सोन्याची किंमत आल्याने, भूमाफियांची खुल्या जागा, शाळा मैदानझ समाजमंदिर, शासकीय जागा आदिवर नजर आहे. महापालिका शाळेच्या मैदानावर एका सामाजिक संस्थेने सनद काढल्याचा प्रकार सध्या गाजत आहे. हे टाळण्यासाठी जागेला सनद देतांना प्रांत कार्यालयाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर