शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

स्वच्छतेचे प्रश्नांकित दर्पण - लोकसहभागातून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:59 AM

केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे.

ठाणे जिल्हा हा २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार २३ मार्च २०१७ रोजी हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला. या पायाभूत सर्वेक्षणामधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या (लॉब) चार हजार ३०२ होती. त्यापैकी तीन हजार ७०९ कुटुंबांना शौचालये बांधून पूर्ण करून देण्यात आली. त्याचे फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पाठवण्यात आले.

जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून टप्पा-२ च्या पडताळणी प्रक्रियेत सर्व ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. नादुरुस्त शौचालयांची संख्या तीन हजार ८९ आहे. त्यांची सर्व कामे पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली आहे. ४३० ग्रामपंचायतींमधील ७७६ गावांच्या स्वच्छता इंडेक्सची माहिती आॅनलाइन करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ८२२ स्वच्छताग्राहींची केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंद करण्यात आलेली आहे.हगणदारीमुक्त ग्रामपंचायतींमध्ये शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्राही, जलसुरक्षक, शिपाई यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ग्रामीण भागात १५० ग्रामपंचायतींमध्ये कला पथकाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली आहे. शंभर ग्रामपंचायतींमध्ये एलईडीद्वारे जागृती केली, तर एसटी महामंडळाच्या १६५ बसगाड्यांवर जाहिरातींद्वारे जागृती केली. ग्रामपंचायतस्तरावर सात हजार ५०० दिनदर्शिकांचे वाटप केले. गावखेड्यांमधील ५० हजार शौचालयांवर स्वच्छतेशी निगडित स्टीकर व १० हजार शोषखड्ड्यांचे स्टीकर लावले. स्वच्छता व शौचालयवापराची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी ५३ जिल्हा परिषद गटांमध्ये स्वच्छतेचे मेळावे घेतले. महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महिला मेळाव्यांवर भर दिला. मासिकपाळी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा कार्यकर्ता आदींद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी सर्व ग्रामसेवक, सरपंच यांच्या कार्यशाळा घेऊन शाश्वत स्वच्छतेचे १५५ आराखडे तयार करून घेतले. उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे १३४ बृहद्आराखडे तयार करण्यात आले आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत. लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळवून स्वच्छतेशी संबंधित उपक्रम राबवल्यामुळे ठाणे जिल्हा ‘स्वच्छता दर्पण’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकला.(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे. या यशस्वितेकरिता ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत२०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने काम केले. दोन वर्षांपूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला. त्यानंतर, जिल्ह्यात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन जिल्ह्याचा ग्रामीण भाग ‘स्वच्छ-सुंदर’ राहावा, याकरिता सातत्याने प्रयत्न केले. 

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान