शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; उल्हासनगर रिपाइंत उभी फूट? भाजपसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 3:57 PM

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपा सोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपा सोबत आगामी महापालिका निवडणुकी बाबत चर्चा केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजप ऐवजी शिवसेना महाआघाडी सोबत आहेत. दरम्यान महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव याना मतदान केल्याने ते महापौर, उपमहापौर पदी निवडून आले. तसेच स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदक दिले. तर एका भाजप सदस्यांने समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने, पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असतांना, पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोबत चर्चा केल्याने, रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला. 

भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदी पक्षाच्या पदाधिकारी सोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय नेते व अध्यक्ष रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. तर पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजप सोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही. असी प्रतिक्रिया दिली. शहर व पदाधिकारी कार्यकारणी बरखास्त केली असेलतर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय? अशी प्रतिक्रिया दिली.

रिपाईची शक्ती विखुरलेली? 

शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाईची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाईची शक्ती अनेक गटातटात विखुरली असून आठवले गटाची ताकद शहरात आहे. तसेच पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून पक्षाकडे भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौर पद आहे. भगवान भालेराव यांच्या एकले रे चलोच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेले पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आघाडीची सोबत केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर