शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

सव्वाचार कोटी खर्चूनही प्रकल्प पीडितांच्या पाण्याचा प्रश्न भिजतच

By admin | Published: August 30, 2016 2:25 AM

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश येत असल्याने त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती करण्याची वेळ राज्यपाल राम नाईक यांच्यावर आली आहे.देशातील पहिला १ आणि २ अणुप्रकल्प सन १९६७ साली तारापूर येथे वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत उभारण्यात आले. त्या नंतर अणु ऊर्जा प्रकल्प ३ आणि ४ च्या उभारणीसाठी अक्करपट्टी आणि पोफरण ही गावे स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचे राम नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन ही करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने न पाळता त्यांना बळजबरीने हलविण्यात आले असे राम नाईकांनी सांगितले. त्या मुळे आपल्या अधिकारासाठी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पर्यंत १२ वर्षाच्या कालावधीत ६० पेक्षा अधिक वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र शासनाच्या पुनर्वसन खात्याचे अधिकारी या प्रकरणात लक्ष देत नसल्याने प्रकल्पग्रस्त पिण्याच्या पाण्यासारख्या साध्या सोयीपासून आज वंचित आहेत. अशा वेळी केंद्रात आणि राज्यात राम नाईकांचा भाजपा हा प्रमुख पक्ष दोन वर्षापासून सत्तेत असतांना प्रकल्पग्रस्तांवर अशी पाळी का ओढवली जाते आणि हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना का विनंती करावी लागते ? हा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन हा राम नाईक यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून १२५० प्रकल्प पीडित ग्रामस्थ आपल्या अधिकारासाठी सन २००४ पासून उच्च न्यायालयात गेले असताना राम नाईक ही त्यांच्या याचिकेत सहभागी झाले होते. मात्र आता ते उत्तर प्रदेश चे राज्यपाल असल्याने घटनात्मक जबाबदारी मुळे आपण न्यायालयीन कामात सहभागी होऊ शकत नाही असे सांगून ते तूर्तास बाजूला झाले आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले असून पाणी,गटारे,आरोग्य सेवे सारख्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठीही प्रकल्पग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे हे खूपच वेदनादायी आहे. प्रकल्प उभारतांना स्थानिकांनी दाखविलेले मोठे मन सरकारने विसरु नये.(वार्ताहर)