शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान

By नितीन पंडित | Updated: March 13, 2024 19:55 IST

"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे"

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: देशातील लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून निवडणुकीची वेळ असली तरी राहुल गांधी यांनी तीन वर्षांपासून देशात न्याय यात्रेचा प्रयोग केला आहे, तो या देशाला एकजूट ठेवण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी आहे.देशातील लोकांसमोर प्रश्न आहे देशाची लोकशाही वाचणार की नाही. देशात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.तरुण महिला शेतकरी उद्योजक या सर्व वर्गासमोर प्रश्न उभा आहे.भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे. खोटे बोलतात रेटून बोलतात वस्तुस्थिती कोणी समोर ठेवत नाही ,खरी माहिती जनतेसमोर ठेऊन जनतेने त्यावर विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता भिवंडी तालुक्यात दाखल होणार असून १५ मार्च रोजी शहरातील स्वर्गीय आनंद दिघे चौक येथे सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार असून तेथून त्यांचा मुक्काम सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी होणार असून याठिकाणची व्यवस्था व पाहणी करण्यासाठी खान बुधवारी भिवंडीत आले होते.या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन माजी खासदार सुरेश टावरे,तालुकाध्यक्ष विजय पाटील यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महविकास आघाडीतील शरद पवार,उद्धव ठाकरे हे देशातील लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत.भिवंडीत न्याय यात्रा येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच पण सर्वसामान्य जनतेला सुध्दा या यात्रेची उत्सुकता आहे.ऐतिहासिक अशी गर्दी यानिमित्ताने होणार असल्याची माहिती देत खोटी आश्वासन देऊ भावनात्मक आव्हान करून भाजपाने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार गावागावां मध्ये पोहोचणार आहे.त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसला होईल असा विश्वास आरिफ नसीम खान यांनी शेवटी व्यक्त केला.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी