शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 23:44 IST

महालक्ष्मी एक्स्प्रेस : रेल्वेचा बेजबाबदारपणा उघड

पंकज पाटील

बदलापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेस २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसाने आलेल्या पुरात अडकल्यानंतर, हे प्रकरण रेल्वेने तहसीलदारांवर शेकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, रेल्वेचे हे प्रयत्न हाणून पाडत, तहसीलदारांनी दिलेल्या उत्तरामुळे रेल्वेचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची कल्पना बदलापुरातील उपस्टेशन प्रबंधकांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका तहसीलदारांनी ठेवला आहे. एवढेच नव्हे तर, पुराची माहिती देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्याचेही समोर आले आहे. तहसीलदार कार्यालयाने रेल्वेला सतर्क राहण्याच्या सूचना देऊनही रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

२६ जुलै रोजी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही २७ जुलै रोजी पहाटे चामटोली गावाजवळ पुराच्या पाण्यात अडकली होती. या प्रकरणात कुणाची चूक आहे, ते शोधण्याच्या भानगडीत न पडता शासकीय यंत्रणांनी सर्वात आधी प्रवाशांना वाचवण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. मात्र, या यशस्वी मोहिमेनंतर रेल्वेविषयी प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. पुरात एक्स्प्रेस अडकण्यामागे रेल्वेचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप होत असल्याने रेल्वे अधिकाºयांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी हे प्रकरण तहसीलदार कार्यालयावर शेकण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या सहकार्यकारी अभियंत्यांनी तहसीलदारांना २९ जुलै रोजी पत्र पाठवत बारवी धरणातून पाणी सोडल्याची माहिती न दिल्याचे आणि पुराची माहिती न दिल्याचा आरोप करत खुलासा मागवला होता. रेल्वेच्या या पत्राला अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तरामुळे रेल्वे प्रशासन तोंडघशी पडले आहे.अंबरनाथ तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने २६ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजता बदलापूरच्या उपस्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात अंबरनाथ तहसील कार्यालयातील कर्मचारी रवींद्र शिंदे यांना पाठवण्यात आले होते. त्यावेळी उपस्टेशन प्रबंधक यांना पूरपरिस्थितीची कल्पना देऊन तहसीलदारांचे बोलणेही करून दिले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांनी उद्धट वर्तन करत तहसीलदारांनाच बेजबाबदार उत्तर दिले. रेल्वेचे अधिकारी हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे तहसीलदारांच्या लक्षात आले. शासनाचा प्रतिनिधी रेल्वे अधिकाºयांच्या कार्यालयात माहिती देण्यासाठी जातीने गेल्यावरही त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. तहसीलदारांनी आपली जबाबदारी पार पाडली असतानाही, रेल्वेने मात्र हे प्रकरण गांभीर्याने न घेता महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.रेल्वेचे बेजबाबदार पत्र आले अंगलटरेल्वे अधिकाºयांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस प्रकरणात बारवी धरणाला जबाबदार धरत तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. या पत्रात बारवी धरणातून पाणी सोडल्याची कल्पना रेल्वेला न दिल्याने सर्व प्रकार घडल्याचा ठपका ठेवला. याप्रकरणी रेल्वेने तहसीलदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे अधिकाºयांनी हे पत्र पाठवताना बारवी धरणातून नेमके पाणी सोडले की नाही, याची चाचपणी केली नाही. रेल्वेच्या पत्रात बारवीतून पाणी सोडल्याचा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या दिवशी बारवीतून पाणीच सोडले नव्हते. रेल्वेचे अज्ञान रेल्वेच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.पूर्वतयारीच्या बैठकीत स्टेशन प्रबंधक अनुपस्थित : अंबरनाथ तहसीलदारांनी ६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या कार्यालयात नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला रेल्वेचे उपप्रबंधक यांनाही हजर राहण्याचे पत्र दिले होते. मात्र, या बैठकीला अंबरनाथ आणि बदलापूरचे स्टेशन उपप्रबंधक हजर राहिले नव्हते. ही चूकदेखील तहसीलदारांनी निदर्शनास आणून दिली आहे. तहसीलदारांनी दिलेल्या पत्रात बदलापूर रेल्वे उपप्रबंधक हे कारवाईस पात्र असल्याचे म्हटले.

टॅग्स :Mahalaxmi Expressमहालक्ष्मी एक्सप्रेसbadlapurबदलापूरRainपाऊसfloodपूर