शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

जिल्ह्यात पावसाची संततधार

By admin | Published: July 23, 2015 3:58 AM

मंगळवारी जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवारीही आपला जोर कायम ठेवला. सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप दिलेल्या पावसा

ठाणे : मंगळवारी जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाने बुधवारीही आपला जोर कायम ठेवला. सकाळच्या सत्रात काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोर धरला. मात्र, कुठेही फारसे नुकसान झाले नाही. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांसाठी शेतांकडे धाव घेतली आहे. तर, पालघरमधील पूरस्थिती ओसरली असली तरीही सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आगामी ४८ तासांत ठाण्यासह कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सुमारे १५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने मंगळवारपासून चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात १०४.८९ मिमी इतका पाऊस झाला असून धरणामधील पाणीसाठा ७६.०२ टक्के इतका झाला आहे. मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसाने बुधवारी पहाटे साडेतीन वाजेपासून थोडीशी उघडीप दिली होती. मात्र, दुपारी १ वाजेपासून पावसाने पुन्हा आपली संततधार सुरू केली. ठाणे शहरातील घंटाळी येथे एक झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. बुधवारी दिवसभरात ठाण्यात ९८ मिमी, कल्याणात १०० मिमी, मुरबाडमध्ये १०६ मिमी, भिवंडीत १८० मिमी, शहापूर १५२ मिमी, उल्हासनगर ६१ मिमी, अंबरनाथ ३६.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७३४.२० मिमी इतका पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच सुमारास तो ७३९.५३ मिमी इतका होता. सर्वाधिक पाऊस हा ठाणे परिसरात झाला असून सर्वात कमी उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यांत झाला आहे.मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांच्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळीदेखील उंचावण्यास मदत झाली असून भातसामध्ये १२.८४ टक्के तर मोडकसागरमध्ये २.५४ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. तानसा आणि बारवी धरणांमध्ये अनुक्र मे १.५७ आणि १.११ टक्के पाणीसाठा आहे. बिर्लागेट : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला असून रायता-दहागाव रस्त्यावर झाड पडले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, अशी भीती आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यात ३०० मिमीच्या आसपास पाऊस पडला, तर आतापर्यंत ९५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कालच काळू नदीवरील रुंदा पूल पाण्याखाली गेल्याने १० ते २० गावांचा संपर्क तुटला होता. आज पडणाऱ्या संततधार पावसामुळे उल्हास नदीस पूर आला आहे. म्हारळ, रायता, कांबा येथील सखल भागात पाणी साचले होते. तर पाचरघोळ, पाचवामैल येथील गणेशघाट पाण्याखाली गेला होता. भिवंडी : ठाणे महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या समांतर रस्त्यावरील धूळ खाडीचा लहान पूल तुटल्याने महानगरपालिकेच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच सोनाळे-बापगाव दरम्यानच्या १५ गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील भातसा-पिसे धरणामधून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ठाणे महानगरपालिकेने टाकली असून या पाइपलाइनची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र रस्ता बनविला आहे. या रस्त्यावरून परिसरातील १५ गावांतील ग्रामस्थ दररोज शहरात येत होते. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात या मार्गावरील धूळखाडीचे पाणी पुलावरून वाहत जाऊन त्या पाण्यात काल रात्रीदरम्यान पूल वाहून गेला. सोनाळे-बापगावदरम्यानचा हा पूल सन १९७० मध्ये ठाणे महानगरपालिकेने बांधला होता. काळू नदीला पूरटिटवाळा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने टिटवाळा शहराशी असलेला १५ गावांचा संपर्क दोन दिवसांपासून तुटला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी यामुळे भाजीवाले, दूधवाले, शाळा, कॉलेज विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुलावरील पाणी ओसरणे कठीण आहे.