शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

धोधो पावसातही पाण्यासाठी वणवण!

By admin | Published: July 17, 2017 1:05 AM

एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे. महिनाभर या ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी, रहिवाशांना बोअरिंग आणि टँकरचा आधार घ्यावा लागला असून येथील रस्ताही दलदलीत सापडल्याने त्यांची पायवाटही बिकट झाली आहे. गटारांच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणी साथीचे आजारही बळावले आहेत. केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांमध्ये नांदिवली गाव, मीनल पार्क हा प्रभाग येतो. या ठिकाणी रविकिरण सोसायटी असून या सोसायटीअंतर्गत ४० टॉवर बांधण्यात आले आहेत. परंतु, आजघडीला येथील बहुतांश टॉवरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. महिनाभर ते टँकर आणि बोअरिंगच्या पाण्याचा वापर करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रुपयांची बिले पाठवली जातात. ते रहिवासी भरतातही. पण, पाण्याची कायम बोंब असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील चाळींना मुबलक पाणी आहे. पण, टॉवरवासीयांना पाणी नाही. अखेर, या रहिवाशांना चाळींचा आधार घ्यावा लागला आहे. विकासकाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने या दलदलीतून वाट काढतच संबंधित रहिवाशांना येजा करावी लागत आहे. येथील स्मृती टॉवर आणि त्या परिसरातील अन्य टॉवरकडे जाण्यासाठी गटाराच्या पाण्यातून जावे लागते. दलदलीमुळे डासांची पैदास होऊन स्मृती टॉवरमधील ६ ते ७ जण डेंग्यूने आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.